रायगड: माणगाव तालुक्यात उध्दव ठाकरे गटातील वाद, स्नेहल जगताप यांच्या प्रचारावर परिणाम

रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, आणि पोलादपूर तालुके हे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात. मात्र, शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर उध्दव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन प्रमुख गट निर्माण झाले, ज्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलली आहेत.

उध्दव ठाकरे गटाने स्नेहल जगताप यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांच्या प्रचार मोहिमेत उध्दव गटामध्येच दोन वेगळे गट तयार झाले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. माजी केंद्रीय मंत्री आनंद गीते आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या समर्थकांमध्ये मतभेद असून, याचा थेट फटका स्नेहल जगताप यांच्या प्रचारावर दिसून आला.

गेल्या अडीच वर्षांत विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. या बदलांमुळे अनेक नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी निष्क्रिय झाले आहेत. प्रचाराच्या काळातही या वादाचा परिणाम दिसून आला. विशेषतः आनंद गीते यांच्या गटाचे अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते स्नेहल जगताप यांच्या प्रचारात सक्रिय दिसले नाही.

याशिवाय, स्नेहल जगताप यांच्या निकटवर्तीय कुटुंबातील काही सदस्यांमुळे स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचे बोलले जाते. काही कार्यकर्त्यांनी आपले पद सोडण्याची तयारी दर्शवली असून, यामुळे पक्षाची ताकद कमी होण्याचा धोका आहे.

दुसरीकडे, या गोंधळाचा सर्वाधिक फायदा एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांना होण्याची शक्यता आहे. उध्दव गटातील गटबाजी आणि नाराजीमुळे भरत गोगावले यांचा जनतेवरील प्रभाव वाढण्याची चिन्हे आहेत.

  • Related Posts

    झटका मटण विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा, महाराष्ट्र क्रांती संघटनेचे मुख्यमंत्री यांना निवेदन !

    महाराष्ट्र क्रांती संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करून झटका मटण विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या मल्हार सर्टिफिकेटचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. मंत्री नितेश राणे यांनी…

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण ईश्वरीय आदेशाने आलो असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठी चर्चा आणि विरोधकांकडून टीका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू