राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता १४ किंवा १५ डिसेंबरला

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी हा विस्तार १४ किंवा १५ डिसेंबरला होण्याची अधिक शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. तीन पक्षांमधील नेत्यांची चर्चा, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत, आणि दिल्लीकडून मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेमुळे विलंब होण्याचे संकेत आहेत.

विधिमंडळाचे नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार त्यापूर्वीच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. तथापि, शिंदे गटाचे नेते भरत गोगावले व संजय शिरसाट यांनी हा विस्तार ११ किंवा १२ डिसेंबरला होईल, अशी माहिती दिली होती.

विस्तारासाठी संभाव्य तारखा

विधानसभेचे अधिवेशन ९ डिसेंबरपर्यंत चालणार असल्याने ११ तारखेला लगेच विस्तार होणे कठीण आहे. १२ डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीस नागपुरात व्यस्त असतील. त्यामुळे १४ डिसेंबरला मुंबईत किंवा १५ डिसेंबरला नागपुरात शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदांचे वाटप

  • भाजप: २२
  • शिंदेसेना: १२
  • अजित पवार गट: ९

विधान परिषदेच्या सदस्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही, मात्र काही अपवाद करण्यात येऊ शकतो. तसेच, काही जुन्या मंत्र्यांना वगळले जाऊ शकते. घटक पक्षांच्या नावांबाबतही चर्चा सुरू असून, वादग्रस्त नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आग्रह आहे.

विधानसभाध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर

विधानसभेच्या अध्यक्षपदावर भाजपकडून ॲड. राहुल नार्वेकर यांनाच पुन्हा संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी आणि खातेवाटपासाठी सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री व केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाकडे लागले आहे.

  • Related Posts

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    राजधानी मुंबईत आज सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून मुंबई पुन्हा एकदा ‘तुंबई’ बनल्याचं चित्र आहे. पावसाचा सर्वाधिक फटका…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    राज्यात विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला ‘अलर्ट मोड’वर राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांमध्ये तत्काळ पंचनामे करण्याचे…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू