शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करण्यासाठी शालेय प्रार्थनेवेळी विशेष शपथ घेतली जाणार आहे. या शपथेमध्ये, मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही आणि माझ्या आजूबाजूला जर अशा पदार्थांचा वापर होताना दिसला, तर मी त्वरित शिक्षक पालकांना कळवेन,” अशा प्रकारचा आशय असणार आहे. तसेच, प्रत्येक वर्गात दररोज दहा मिनिटे एका शिक्षकाने अमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करावे, असा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि कायदासुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रशासन विशेष पावले उचलत आहे. अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग चिंतेचा विषय असल्यामुळे आवश्यक त्या कायद्यात सुधारणा करण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली सहा उपअधिक्षकांची कृती समिती स्थापन करण्यात आली असून, आठवडाभरात हा टास्क फोर्स आपला अहवाल सादर करेल. पोलिसांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून मदत केली जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

Related Posts

२०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू

राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रमाचा Pattern लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत…

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

Leave a Reply

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार