डोंबिवली: एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक !

शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही विद्यार्थिनीचा प्रवेश न करता तिचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया घालवले. ही फसवणूक २०२१ ते २०२२ या कालावधीत घडली असून, याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा रचला फसवणुकीचा कट…

तक्रारदाराने आपल्या मुलीच्या MBBS प्रवेशासाठी काही लोकांशी संपर्क केला असता आरोपींनी स्वतःला शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ असल्याचे भासवले. यापैकी एकाने स्वतःला केईएम रुग्णालयाच्या व्यवस्थापन समितीचा सदस्य, तर दुसऱ्याने नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी असल्याचे सांगितले.

प्रवेश प्रक्रियेसाठी ५० लाख रुपये लागत असल्याचे सांगून नंतर १५ लाखांवर तडजोड करण्यात आली. हे पैसे नंतर परत मिळतील असा विश्वास तक्रारदाराला दिला. बँक खात्याचा कोरा धनादेश देऊन विश्वास संपादन केला. या भूलथापांना भुलून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने १६ लाख ८० हजार रुपये संबंधित खात्यांवर जमा केले.

फसवणूक उघडकीस कशी आली?

रक्कम भरल्यानंतर तक्रारदाराने प्रवेशाविषयी विचारणा सुरू केली. आरोपींनी तुमच्या मुलीचा प्रवेश निश्चित झाला असून तिची परीक्षा आणि गुणपत्रिकासुद्धा तयार आहे, असे सांगून वेळ मारून नेली. यावर संशय आल्याने तक्रारदाराने इतर आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले.

याप्रकरणी तक्रारदाराने मुख्य आरोपीकडे पैसे परत मागितले असता त्याने सुरुवातीला आम्ही आपले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, पण नंतर त्यानेही संपर्क तोडला. अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांचा पुढील तपास सुरू…

या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. पालकांनी अशा भूलथापा आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Posts

२०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू

राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रमाचा Pattern लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत…

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

Leave a Reply

You Missed

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार