राज्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ – एका वर्षात ७,६३४ कोटींची फसवणूक !

राज्यात २०२४ या एकाच वर्षात सायबर चोरट्यांनी तब्बल ७,६३४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या प्रकरणांमध्ये केवळ ११ टक्के आरोपींना अटक करण्यात आली असल्याचेही समोर आले. भाजप आमदार मोहन मते आणि अन्य आमदारांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
विशेष म्हणजे, ७,६३४ कोटींपैकी ६,००० कोटी रुपयांची फसवणूक केवळ पुणे जिल्ह्यातीलच आहे. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. राज्यात सध्या ५० सायबर पोलिस ठाणे कार्यरत असून, त्याठिकाणी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि नांदेड येथे अत्याधुनिक सायबर गुन्हे विभाग सुरू करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत सायबर सुरक्षा प्रकल्प
सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापे, नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचा सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नोडल सायबर पोलिस ठाण्यासह सहा प्रमुख विभाग कार्यरत असतील.
सायबर चोर विविध युक्त्या वापरून नागरिकांना फसवत आहेत. ते नकली पोलिस किंवा कस्टम अधिकारी बनून फोन करतात आणि मनी लॉंड्रिंग किंवा ड्रग्ज प्रकरणात अडकवल्याचा बनाव करतात. त्यामुळे नागरिक घाबरून त्यांच्या सांगण्यावर पैसे पाठवतात. अशा फसवणुकीपासून सावध राहणे आणि संशयास्पद कॉल्सला प्रतिसाद न देणे हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी आहे.

  • Related Posts

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र…

    CSMT स्थानकात मोठा अपघात टळला: क्लिनिंग मशीन रुळावर कोसळली, मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आणि मोठा अपघात टळला. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून प्लॅटफॉर्म स्वच्छतेसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी क्लिनिंग मशीन…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार