उशीराचा शेवट: एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर पडलेली काळी छाया

मार्च-एप्रिल महिन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक, ताणतणावाने भरलेला काळ. पालक, शिक्षक, आणि संपूर्ण समाज जिथे परीक्षेला अंतिम सत्य मानतो, तिथे एका विद्यार्थ्याच्या उशिरामुळे त्याचं आयुष्यच संपलं. ही केवळ घटना नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला हादरवणारा आरसा आहे.

मुंबईतील जुहू येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमधील नववीच्या वर्गात शिकणारा के. शक्तीवेल या विद्यार्थ्याला फक्त उशीर झाल्यामुळे परीक्षेला बसू देण्यात आलं नाही. हा विद्यार्थी आजारी होता. नेहरू नगरमधील एका साध्या, गरीब कुटुंबातून आलेला. जेव्हा तो अखेरच्या आशेने शाळेत पोहोचला, तेव्हा त्याला फक्त एकच उत्तर मिळालं – “माफ करा, तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही.” वैद्यकीय प्रमाणपत्र मागण्यात आलं, पण त्या काही मिनिटांच्या गोंधळात, तो मुलगा मानसिकदृष्ट्या कोसळला.

 

काही वेळांनी तो घरी परत गेला आणि तिथेच त्याने स्वतःचं स्वतःच्या घरी गळ फास घेऊन आत्महत्या केली. एका परीक्षा केंद्राच्या दारात थांबलेलं स्वप्न, आयुष्याला लागलेला शिक्का आणि एक पोरकी वेदना. यापेक्षा भयंकर काय असू शकतं?

शक्तीवेलच्या कुटुंबाने शाळेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना न्याय हवा आहे, पण या घटनेने आपण सर्वांनी थबकून विचार करण्याची गरज आहे. आपण मुलांना काय शिकवतोय? अभ्यासाची शिस्त की मानसिक दडपण? शाळा म्हणजे जिथे ज्ञान मिळतं, की जिथे संवेदना हरवतात?

आज शक्तीवेल नाही पण उद्या पुन्हा असं कुणाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी आता शिक्षण व्यवस्थेने मनापासून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

  • Related Posts

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    मराठा समाजाला राज्य सरकार या पद्धतीने आरक्षण देऊ शकते!

    महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पुनर्उच्चारला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या उपोषणामुळे हा मुद्दा एकदाच राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. अशा वेळी, राज्य सरकार कोणत्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू