आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव: रोजगार की धोका?

टेक्नोसॅव्ही युगात सगळ्यात मोठा तांत्रिक बदल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). आज AI केवळ विज्ञानकथांपुरती मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आरोग्य, शिक्षण, बँकिंग, वाहतूक, ग्राहक सेवा अशा अनेक क्षेत्रांत AI मुळे वेगवान निर्णय, अचूक विश्लेषण आणि कमी वेळेत कार्यक्षमता वाढली आहे. मात्र याचसोबत “AI मुळे लाखो नोकऱ्या जातील” हा धोका देखील व्यक्त केला.
AI प्रणाली विशिष्ट कामे खूप कमी वेळात व अचूकपणे करू शकते. उदाहरणार्थ, मोठ्या डेटाचं विश्लेषण, ग्राहकांच्या सवयी ओळखणे, वैद्यकीय निदानासाठी डेटा स्कॅन करणे. तसेच
जरी काही पारंपरिक नोकऱ्या कालबाह्य होत असल्या तरी AI च्या वापरामुळे डेटा अ‍ॅनालिस्ट, मशीन लर्निंग इंजिनिअर, AI ट्रेनर, रोबोटिक्स स्पेशालिस्ट अशा नव्या प्रोफाइल्स निर्माण होत आहेत. याचबरोबर उत्पादन प्रक्रियेत AI वापरल्यामुळे यंत्रसामग्री कमी त्रुटींसह काम करते. ऑटोमेशनमुळे खर्च कमी होतो आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो. हे फायदे झाले आहेत.
तर याउलट  बँकिंग, ग्राहक सेवा, कस्टमर सपोर्ट, ट्रान्सलेशन, डेटा एंट्री, ड्रायव्हिंग यांसारख्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात येत आहेत. उदाहरणार्थ, काही कंपन्यांनी chatbot वापरून कॉल सेंटरमध्ये मानवबळ कमी केलं आहे. तसेच भारतात अजूनही मोठा वर्ग तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत नाही. AI क्षेत्रात काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि अभ्यास आवश्यक आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कामगार वर्गाला त्वरित नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतात आणि काही क्षेत्रांत मानवी विचारांची, करुणेची, नैतिकतेची गरज असते. AI अजूनही या मानवी भावनांची समज फारशी विकसित करू शकलेली नाही. त्यामुळे शिक्षण, मानसोपचार, समाजसेवा अशा क्षेत्रांत AI ची मर्यादा आहे.
AI चा स्वीकार करताना त्यासोबत मानवकेंद्रित दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यातील रोजगार सुरक्षित ठेवण्यासाठी खालील उपाय महत्त्वाचे ठरू शकतात:
•कौशल्य विकासावर भर: शिक्षणसंस्थांनी AI संबंधित अभ्यासक्रम चालू करावेत.
•संवेदनशील नोकऱ्यांचे संरक्षण: अशा नोकऱ्या ज्या फक्त मानवी भावनांवर अवलंबून आहेत, त्या सुरक्षित राहतील.
•AI चे नैतिक उपयोग: AI वापरताना गोपनीयता, भेदभाव विरहितता आणि पारदर्शकता राखणे आवश्यक आहे.
AI ही काळाची गरज आहे. ती संधी देखील आहे आणि धोका देखील – सर्वस्वी आपल्यावर आहे आपण ती कशी वापरतो. युवकांनी पारंपरिक नोकऱ्यांपेक्षा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला भविष्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. सरकार, उद्योग, शिक्षण संस्था आणि युवक – सर्वांनी मिळून एक समतोल, समावेशक आणि शाश्वत तंत्रज्ञान आधारित समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा.
  • Related Posts

    आधार कार्डशी संबंधित मोठा अपडेट: जुना मोबाइल नंबर असल्यास OTP मिळणार नाही! UIDAI कडून नवा नियम लागू

    नवी दिल्ली | ३ मे २०२५ UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने आधार वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर आधार कार्डाशी जोडलेला तुमचा मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून बंद असेल,…

    जर तुम्ही रोजच्या व्यवहारासाठी UPI अ‍ॅप्स – Google Pay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल, तर हे नक्की वाचा…

    १ एप्रिल २०२५ पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा उद्देश डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवणे…

    Leave a Reply

    You Missed

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    बेलकुंड उड्डाणपूलावर भीषण अपघात: माजी आमदार आर.टी. देशमुख गंभीर जखमी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू