कपडे बघूनच रुग्णांना देतात प्रवेश; दिनानाथ रुग्णालयाबाबत रविंद्र धांगेकरांचा गंभीर आरोप !

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, रुग्णालय प्रशासनाविरोधात गंभीर आरोप होत आहेत. रुग्णालयाने उपचार सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांची आगाऊ रक्कम मागितल्यामुळे उपचारास विलंब झाला आणि तनिषा यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन समित्यांपैकी राज्य शासनाच्या समितीचा अहवाल काल (7 एप्रिल) सादर झाला असून त्यात रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणावर आता शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रुग्णालय प्रशासनावर धक्कादायक आरोप करत रुग्णसेवेतील असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“कपड्यांवरून रुग्णांशी वागणूक ठरवतात”

धंगेकर म्हणाले, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण येतात. मात्र तिथे रुग्णांना त्यांच्या कपड्यांवरून, आर्थिक परिस्थिती पाहून वागणूक दिली जाते. संचालक स्वतःला मालक समजून वागतात आणि त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे कोणी काही म्हणू शकत नाही.”

“शासकीय सवलती असूनही थकबाकी”

ते पुढे म्हणाले, “मंगेशकर कुटुंबाचे योगदान देशासाठी मोलाचे आहे, पण रुग्णालय आणि कुटुंब हे वेगवेगळे घटक आहेत. या रुग्णालयाला सरकारने मोक्याच्या ठिकाणी जागा विनामूल्य दिली आहे. तरीही पुणे महानगरपालिकेचा 27 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. शंभर कोटींपेक्षा अधिक दंड आकारण्यात आलेला असून तोही भरलेला नाही.”

“शासनाने ताब्यात घ्यावे”

धंगेकर यांनी शासनाकडे मागणी केली की, “या रुग्णालयाचा व्यापारी उपयोग होतो आहे. इथे कुठल्याही नियमानुसार काम केले जात नाही. त्यामुळे शासनाने हे रुग्णालय ताब्यात घेऊन प्रशासक नेमावा. जेणेकरून रुग्णांना न्याय मिळेल.”

या प्रकरणावर अजूनही विविध स्तरांवर चौकशी सुरू आहे. मात्र या घटनेमुळे खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

  • Related Posts

    पुण्यात PMPML बसचा ब्रेक फेल झाल्याने ५ ते ६ दुचाकी, रिक्षा आणि वाहनांना जोरदार धडक, ४ जण जखमी…!

    पुणे: शहराच्या चांदणी चौक परिसरात शुक्रवारी सकाळी पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी, रिक्षा आणि…

    ‘बिझनेस ट्रिप’ ठरली शेवटची! बिहारमध्ये पुणेरी व्यावसायिकाची हत्या..

    पुण्यातील कोथरूडमधील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) यांची बिहारमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते पाटणा येथे गेले होते, मात्र तेथून पुन्हा…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार