पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष;पवई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘ख्वाहिश २०२५’ हा १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्यभरातील ७४ महाविद्यालयांमधील तब्बल १४३८ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व कार्यक्रमांत सहभाग नोंदवला.

यंदा महोत्सवाची संकल्पना “ऐसा देस है मेरा” अशी असून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, विविधतेतील एकता आणि कलात्मक वारसा यांचे दर्शन घडवणारी ठरली.

या अंतर्गत आयोजित ३६ हून अधिक आकर्षक स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये कला, साहित्य, क्रीडा, मनोरंजन आणि सर्जनशीलतेचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.

महोत्सवात परफॉर्मिंग आर्ट्स, लिटरेरी आर्ट्स, फाइन आर्ट्स, गेम्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स, इन्फॉर्मल्स, स्टार इव्हेंट्स आणि मीडिया इव्हेंट्स अशा विविध विभागांचा समावेश होता. टीचर्स गॉट टॅलेंट, फॅशन शो, मिस्टर अ‍ॅण्ड मिस ख्वाहिश, वॉर ऑफ डीजे, डीजे नाईट या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद लाभला. तसेच फोटोग्राफी, रील मेकिंग आणि शॉर्ट फिल्म मेकिंग या मीडिया स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची कल्पकता व सर्जनशीलता ठळकपणे समोर आली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी
व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत गोपाळ शर्मा यांच्यासोबत महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. वैशाली राजपूत,
पद्मश्री डॉ. जसपिंदर नरुला या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर अभिनेत्री प्रतीक्षा मिश्रा यांनी विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाला शोभा वाढवली.

दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कलाकार शहजाद अली यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.

विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकारांना एकाच मंचावर आणणारा ‘ख्वाहिश २०२५’ हा महोत्सव केवळ स्पर्धांचा सोहळा न राहता, भारतीय संस्कृती, एकात्मता आणि तरुणाईच्या ऊर्जेचा उत्सव ठरला. पवईत रंगलेला हा सांस्कृतिक महोत्सव सहभागी विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय अनुभव ठरला.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

२०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू

राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. २०२५ पासून राज्यातील शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रमाचा Pattern लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ही अत्यंत…

शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे बारावीचे पेपर जळाले; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात….!

बारावी बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तणावातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, निकालाबद्दलची चिंता अद्याप त्यांच्या मनात होतीच. बोर्डाच्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाते, परंतु काही शिक्षकांच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

  • By Admin
  • December 18, 2025
ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

  • By Admin
  • December 15, 2025
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

  • By Admin
  • December 2, 2025
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष