“ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली…” — आजचा कटू आरसा

अमोल भालेराव, मुख्य संपादक – जागृत महाराष्ट्र

 “ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली,

 ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,

 मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…!

 कारण ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!”

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

कधी काळी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पवाड्यांच्या रूपात जे शब्द उच्चारले,
ते त्या काळातील शासनाच्या पायाभूत ढोंगीपणावर वज्रघात होते.
पण आज, अनेक दशकांनंतरही हेच शब्द आजच्या भारतात प्रत्यक्ष सत्यासारखे जिवंत दिसतात.
फरक फक्त एवढाच की, तेव्हा ही व्यवस्था नव्याने उभी राहत होती —
आणि आज ती संपूर्णपणे सडलेली, विकलेली आणि विकृत झाली आहे.

आज अधिकारी वर्गाला सरकारी पगार कामासाठी मिळतो,
पण काम करण्याऐवजी तोच अधिकारी फाइल हलवण्यासाठी चारपट वसुली करतो.
लोकशाहीचं नाव घेत नेते मंडळी मोठमोठे भ्रष्टाचार करून
देशाचे भूखंड, संपत्ती आणि मातीपर्यंत विकत आहेत.
हे सगळं पाहूनही जनता शांत आहे —
कारण ती लाचारीच्या साखळीत जखडली गेली आहे.

मतदानाच्या काळात ५ किलो रेशन,
दारूची बाटली, मटणाचा डबा, आणि दोन-तीन हजार रुपयांच्या नोटा —
हाच आजचा लोकशाहीचा हिशोब बनला आहे.
ही जनता आता विचारत नाही, ती फक्त विकली जाते.
स्वातंत्र्य मिळालं, पण विचार गुलाम झाले.

अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला तो ज्वालाग्राही नारा —

“ये आज़ादी झूठी है, हमारी जनता भूखी है.”

आज पुन्हा तितकाच जिवंत आणि तितकाच सत्य वाटतो. तेव्हा जनता भुकी होती;

न्यायासाठी, सन्मानासाठी आणि आशेच्या एका किरणासाठी भुकी आहे.

न्यायालयं आज काहींची रखेल झाली आहेत,
संसद ही हिजड्यांची हवेली झाली आहे —
हे केवळ शब्द नाहीत,
तर त्या लाखो नागरिकांच्या मनातील उसळती नाराजी आहे
ज्यांना आज न्यायाची अपेक्षा ठेवणे म्हणजे अपराध वाटतो.

शेतकरी आत्महत्या करत आहे,
तरुण बेरोजगारीने ग्रासला आहे,
तुरुंगात अनेक निर्दोष न्यायाच्या नावाखाली कुजत आहेत.
आणि सत्ता मात्र “सब ठीक है” म्हणत रंगमंचावर नाचत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली —
पण आजही अण्णाभाऊंचा तो आवाज कानात घुमतो :
“आज़ादी जुटी है… हमारी जनता भूखी है…”
प्रश्न आहे — आपण हे मान्य करणार का?
की पुन्हा एकदा आपल्याच लाचारीने या व्यवस्थेला
रंगीन, भ्रष्ट आणि निर्लज्ज बनू देणार?

🖋️ अमोल भालेराव
मुख्य संपादक — जागृत महाराष्ट्र
“सत्य सांगणं हा गुन्हा नाही;
पण सत्य ऐकणं आजच्या समाजाला अवघड झालं आहे.”

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    ‘युद्धाच्या पलिकडचा विचार”

    मुंबई: विकासाच्या छायेत घाण आणि भ्रष्टाचाराचे वास्तव — जागृत महाराष्ट्र न्यूज, संपादक अमोल भालेराव

    भारताची आर्थिक राजधानी, मायानगरी, स्वप्नांच्या शहराला एक वेगळं स्वरूपही आहे. गगनचुंबी इमारतींनी नटलेल्या रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या आहेत, मोठमोठ्या मॉल्सच्या मागे घाणीचे ढीग आहेत, आणि प्रगतीच्या गजरामध्ये भ्रष्टाचाराचा आवाज मिसळलेला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना

    असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना