गौतमने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला ?

पुणे शहरातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या २४ वर्षीय गौतम गायकवाड बेपत्ता झाल्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली होती. मुळचा साताऱ्याचा गौतम गायकवाड हा हैदराबादहून आपल्या मित्रांसमवेत सिंहगडावर फिरायला गेला होता. ‘लघुशंका करुन येतो’, असं मित्रांना सांगून तो गेला, पण पुन्हा परतलाच नाही. मित्रांनी शोधाशोध केली असता, त्यांना गडावरील तानाजी कडा येथे त्याची चप्पल आढळली. त्यावरुन असं समजलं की तो, तानाजी कडावरुन खाली दरीत कोसळला आहे. एनडीआरएफ, अग्निशामक दल, वन विभाग आणि पोलिसांनी सलग शोधमोहीम हाती घेतली. मात्र, तरीही त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात तो दिसल्याचा दावा झाल्यानं या प्रकरणात अधिकच गूढ वाढलं. २० तारखेला बेपत्ता झालेला गौतम गायकवाड़ २४ तारखेला सापडला. इतके दिवस गौतम गायकवाड होता कुठे ? त्याचा शोध लागला कसा तो खरंच कड्यावरून पडला कि त्याने दिलेला चकवा होता असे एक नव्हे अनेक प्रश्न आहेत.
२० ऑगस्टच्या संध्याकाळी तो हैदराबाद वरून सिंहगडावर आला होता महेश शिंदे, हिमांशू शुक्ला ,वैष्णवी अलगुडे आणि सुरज माळी हे त्याचे मित्रमैत्रिणीसुद्धा त्याच्या सोबत होते.संध्याकाळी ४.३० च्या सुमारास किल्ला फिरल्यावर हॉटेलमध्ये जेवल्यावर हे मित्र तानाजी कड्याजवळ आले.तेव्हा गौतमने आपला मोबाइल मित्राकडे दिला आणि मी लघुशंका करून येतो असं सांगितलं आणि गौतम बराच वेळ आलाच नाही. मित्रांना गडावरील तानाजी कडा येथे त्याची चप्पल आढळली. तानाजी कडावरुन खाली दरीत कोसळल्याचा संशय आला आणि त्याच्या मित्रांनी लगेचच पोलिसांना कळवलं. त्यांनतर सुरु झाला गौतमचा शोध. खोलवर दरीत उतरून गौतमच्या शोध घेण्यात आला. अगदी रविवारी संध्याकाळपर्यंत गौतमचा शोध घेण्यात आला. तरीही गौतमचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अशातच एक सीसीटीव्ही हाती आलं ज्यात सिंहगडाच्या पायथ्याला एक तरुण हुडी घालून लपत चालताना दिसला. हा गौतमच असल्याचा दावा करण्यात आला. मात्र हा दावा गौतमच्या कुटुंबीयांनी फेटाळला. आता गौतम सापडण्याच्या सगळ्या अशा संपुष्टात येत चालल्या होत्या. तितकत्यातच रविवारी संध्याकाळी जिवाच्या आकांताने ओरडताना तो पर्यटकांना तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ सापडला आणि या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण आलं.
स्थानिकांनी गौतमला घरी आणलं. थंडीने कुडकुडत असलेल्या गौतमला त्यांनी प्राथमिक उपचार दिले.पोलिसांना गौतम सापडल्याचं कळताच त्यांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवलं. गौतम बोलण्याच्या मनस्थितीत आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. गौतमने माध्यमांशी बोलताना काही दावे केले. त्याने केलेल्या दाव्यानुसार तो किल्ल्याच्या कड्यावरून खाली पडला होता. तो कड्याजवळ आला तेव्हा त्याला कुत्रा दिसला. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कुत्रा आणि गौतम दोघेही खाली पडले चार दिवस त्याने वर येण्याचा प्रयत्न केला पण त्याला वर येण्याचा रस्ता सापडलाच नाही त्याने मदतीसाठी आवाज दिला पण तो कुणापर्यंत पोहोचलाच नाही. गवत, दगडांच्या आधाराने तो तिथेच झोपून राहायचा. इतके दिवस अन्नाचा कणही त्याच्या पोटात गेला नाही. त्याला पाण्याचा थेंबही मिळाला नाही. तो उठला कि रस्ता शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्याने वर येण्याचा प्रयत्न केला. पण अंगात त्राण न उरल्याने हे प्रयत्न त्याचे निष्फळ ठरत होते. रविवारी पूर्ण ताकदीनिशी तो गड चढला आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. पण त्याने केलेले दावे संशयास्पद असल्याचं वाटू लागले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमने ज्या कड्यावरून पडल्याचा दावा केला तिथे मोठ्या प्रमाणावर गवत आहे. त्याचा शोध घेतांना अगदी पहिल्या दिवशीही गवत जशच्या तसं होतं. इथून साधा दगड तरी खाली टाकला तरी गवत आडवं होतं मग माणूस पडल्यावर गवत तसंच कसं राहीलं. सिंहगडावर इतकी थंडी आहे कि तासाभरसुद्धा उबदार कपड्यशिअवय इथे राहणंच कठीण आहे.मग इतके दिवस गौतम कसा काय राहिला. गौतमच्या शोधासाठी अनेक पथकं आणि लोक दरीत उतरली होती. जर गौतम आवाज देत होता तर त्यांना आवाज कसा काय ऐकू आला नाही. गौतम बेपत्ता झाला होता तेव्हा त्याला दाढी मिशीसुद्धा होती आणि तो सापडला तेव्हा त्याने क्लीन शेव केली होती. जर तो इतक्या दिवस जंगलात होता तर त्याने क्लीन शेव कशी केली तेही इतकी नीट. या सगळ्यावरून गौतमने हा स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा संशय बळावला. गौतमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम बेपत्ता झाल्यावर त्यांना गौतमने आमच्याकडून आठ लाखाचं, १० लाखाचं कर्ज घेतलं होतं अशी फोन आल्याची माहिती दिली होती. त्यामुळेच कर्जाचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता अशी माहिती मिळतेय.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पुण्यात PMPML बसचा ब्रेक फेल झाल्याने ५ ते ६ दुचाकी, रिक्षा आणि वाहनांना जोरदार धडक, ४ जण जखमी…!

    पुणे: शहराच्या चांदणी चौक परिसरात शुक्रवारी सकाळी पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी, रिक्षा आणि…

    ‘बिझनेस ट्रिप’ ठरली शेवटची! बिहारमध्ये पुणेरी व्यावसायिकाची हत्या..

    पुण्यातील कोथरूडमधील व्यावसायिक लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) यांची बिहारमध्ये अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते पाटणा येथे गेले होते, मात्र तेथून पुन्हा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू