पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जागतिक पातळीवर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि योग्य माहिती पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

या शिष्टमंडळात सुरुवातीला ठाकरे गटातील कोणत्याही खासदाराचा समावेश करण्यात आलेला नव्हता, यावरून खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी संसदेत ठाकरे गटाचे संख्याबळ अधोरेखित करत महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप केला होता.

यानंतर, केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली आणि ठाकरे गटातून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश करण्यात येत असल्याची माहिती दिली. शिवसेनेकडूनही ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हे शिष्टमंडळ देशाच्या हितासाठी आणि दहशतवादाविरुद्ध आहे, आणि त्यामुळे या राष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा दिला जाईल. त्यांनी असेही नमूद केले की, शिष्टमंडळात कोणाची नियुक्ती केली जात आहे, याबाबत पक्षांना योग्य वेळी माहिती देण्याची केंद्र सरकारने काळजी घ्यावी, जेणेकरून गैरसमज टाळता येतील.

ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारकडे लवकरच ‘पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. “दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण एक आहोत. सशस्त्र दलांच्या कारवाईला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांची जबाबदारीही विचारात घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या घडामोडींमुळे, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जात आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत…

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील श्रीक्षेत्र यशवाडी येथे आज मोठी दुर्घटना घडली आहे. हनुमान मंदिराच्या बांधकामादरम्यान दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिराचा काही भाग अचानक कोसळला. घटनेच्या वेळी मंदिर परिसरात भाविकांची…

    One thought on “पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द