पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस आणि होर्डिंग कोसळल्याची घटना

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली असून, शहराच्या मध्यवर्ती भागांत जोरदार सरी कोसळल्या. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळील सणसवाडी येथे एक मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानतळ परिसरातही मुसळधार पावसामुळे नव्या टर्मिनलवर पाणी साचलं. ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे.

जालन्यात अवकाळी पावसाचा कहर – लग्न मंडप कोसळला

जालना जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप कोसळला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सोलापुरात पहिल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, आणि पंढरपूर परिसरात पूर्व मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे शेतांमधून पाणी वाहून गेलं असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या अभावामुळे संकटात सापडलेली लहानसहान पिकं या पावसामुळे वाचली आहेत.

कोकणात धुव्वाधार पाऊस, वीजपुरवठा खंडित

तळकोकणातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यांचाही जोर आहे. विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, संपूर्ण जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. गुहागर तालुक्यातही अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

जामनेरमध्ये वीज कोसळून चार म्हशी ठार

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनासगाव येथे वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. शेतकरी गोपाल इंधाते यांच्या परिवारातील या म्हशी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होत्या. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून महिलांचा आक्रोश हृदयद्रावक होता.

राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवनमानावर परिणाम झाला आहे. काही भागात दिलासादायक स्थिती असली तरी, काही ठिकाणी या पावसामुळे हानीही झाली आहे. प्रशासनाकडून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जागतिक पातळीवर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि योग्य माहिती पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री किरेन…

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीज परिसरात आज दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. महामंडळाच्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार