पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस आणि होर्डिंग कोसळल्याची घटना

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली असून, शहराच्या मध्यवर्ती भागांत जोरदार सरी कोसळल्या. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळील सणसवाडी येथे एक मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानतळ परिसरातही मुसळधार पावसामुळे नव्या टर्मिनलवर पाणी साचलं. ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे.

जालन्यात अवकाळी पावसाचा कहर – लग्न मंडप कोसळला

जालना जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप कोसळला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सोलापुरात पहिल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, आणि पंढरपूर परिसरात पूर्व मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे शेतांमधून पाणी वाहून गेलं असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या अभावामुळे संकटात सापडलेली लहानसहान पिकं या पावसामुळे वाचली आहेत.

कोकणात धुव्वाधार पाऊस, वीजपुरवठा खंडित

तळकोकणातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यांचाही जोर आहे. विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, संपूर्ण जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. गुहागर तालुक्यातही अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

जामनेरमध्ये वीज कोसळून चार म्हशी ठार

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनासगाव येथे वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. शेतकरी गोपाल इंधाते यांच्या परिवारातील या म्हशी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होत्या. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून महिलांचा आक्रोश हृदयद्रावक होता.

राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवनमानावर परिणाम झाला आहे. काही भागात दिलासादायक स्थिती असली तरी, काही ठिकाणी या पावसामुळे हानीही झाली आहे. प्रशासनाकडून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक, कादंबरीकार किंवा शाहीर नव्हते; ते भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एक सांस्कृतिक योद्धे होते. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी दारिद्र्य, स्थलांतर, उपेक्षा आणि अन्याय जवळून…

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजू नका; आधी त्यांच्या न्यायासाठी उभे राहा!

    दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाने गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत प्रत्येक राजकीय पक्ष किती गंभीर आहे, हे देशातील विद्यार्थी आणि मतदारांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा…

    Leave a Reply

    You Missed

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात