पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस आणि होर्डिंग कोसळल्याची घटना

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली असून, शहराच्या मध्यवर्ती भागांत जोरदार सरी कोसळल्या. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळील सणसवाडी येथे एक मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानतळ परिसरातही मुसळधार पावसामुळे नव्या टर्मिनलवर पाणी साचलं. ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे.

जालन्यात अवकाळी पावसाचा कहर – लग्न मंडप कोसळला

जालना जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप कोसळला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सोलापुरात पहिल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, आणि पंढरपूर परिसरात पूर्व मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे शेतांमधून पाणी वाहून गेलं असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या अभावामुळे संकटात सापडलेली लहानसहान पिकं या पावसामुळे वाचली आहेत.

कोकणात धुव्वाधार पाऊस, वीजपुरवठा खंडित

तळकोकणातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यांचाही जोर आहे. विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, संपूर्ण जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. गुहागर तालुक्यातही अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

जामनेरमध्ये वीज कोसळून चार म्हशी ठार

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनासगाव येथे वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. शेतकरी गोपाल इंधाते यांच्या परिवारातील या म्हशी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होत्या. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून महिलांचा आक्रोश हृदयद्रावक होता.

राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवनमानावर परिणाम झाला आहे. काही भागात दिलासादायक स्थिती असली तरी, काही ठिकाणी या पावसामुळे हानीही झाली आहे. प्रशासनाकडून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

  • अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार…

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    मुंबई, दि. २० : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाज आता नागरिकांसाठी थेट (लाईव्ह) प्रसारित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, ही पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात आहे. नगरसेवक हैदर अली…

    Leave a Reply

    You Missed

    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    • By Admin
    • April 22, 2026
    रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

    META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड