ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समिकरणाचा सूर, फडणवीस-लोढांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंगू लागली आहे – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार का? या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे, कारण खुद्द उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी युतीसंदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत.

मुंबई आणि कोल्हापूरसह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये या चर्चेमुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकत्र आले, तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.”

या पार्श्वभूमीवर माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देणं टाळत, “त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज ठाकरे देतील, मी कशी देणार? माझा काय संबंध? तुम्हीच जास्त तारे तोडत आहात. सध्या त्यावर काही बोलण्यासारखं नाही,” असे म्हणत विषयावरून हात झटकले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर “आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू आणि जिंकू,” असा विश्वास व्यक्त केला.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र या संभाव्य युतीवर टीका करत “सब कुछ लुटा कर मिला तो क्या हुआ” असा सिने डायलॉग टाकत टोला लगावला. ते म्हणाले, “शिवसेना आणि मनसे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. जनता विकास बघते. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास होतोय. त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत.

  • Related Posts

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत…

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जागतिक पातळीवर पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि योग्य माहिती पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री किरेन…

    Leave a Reply

    You Missed

    ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समिकरणाचा सूर, फडणवीस-लोढांची प्रतिक्रिया

    ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा समिकरणाचा सूर, फडणवीस-लोढांची प्रतिक्रिया

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – वसईत पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

    सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर; लग्नासाठी मुली असल्याचे सांगून तरुणांची फसवणूक

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल; इको-फ्रेंडली बकरी ईदवरून प्यारे खान यांनाही सुनावलं

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    आरसीबीच्या विजयोत्सवात काळी छाया; चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 10 मृत्यू, अनेक जखमी

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    सुविधा निर्मितीसाठी आलेले २५ कोटी गेले कुठे? आमदार अस्लम शेख यांचा संतप्त सवाल.!

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    जागृत महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन: सामाजिक कार्यकर्त्यांचा भव्य सन्मान सोहळा 2025

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुंबईमध्ये पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन जलमय; विरोधक-सरकार आमनेसामने

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन ‘अलर्ट मोड’वर