संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात;
ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

ठाणे,दि.१५ एप्रिल
देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेले ‘संघटन सृजन अभियान’ ठाणे शहरात सुरू झाले आहे.
‘संघटन सृजन अभियान’ या अभियानाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद, यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस, संघटन सृजन कोकण प्रभारी गुरुबिंदरसिंग बच्चर ही मंडळी ठाणे दौऱ्यावर आले आहेत. या पथकाने बुधवारी ठाणे कांग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदीसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी, कशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबविण्यात येईल याबाबत विस्तृत माहिती दिली. जावेद यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने वर्ष 2025- 2026 संघटनेसाठी समर्पित केले असून अखिल भारतील स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय पथक ठाण्यात आले असून पुढील चार पाच दिवस प्रत्येक मतदारसंघात व ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्थरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. या माध्यमातून आगामी काळात संघर्ष करणारे नेतृत्व निवडले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
तर आमदार अतुल वंजारी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सर्व राज्यभर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहेत. प्रदेश व शहर पदाधिकारी, विविध सेल, ब्लॉक व ब्लॉकस्तरीय सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक स्वरूपात संवाद साधून मते जाणून घेण्यात येतील. नवीन जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी कशा पद्धतीचे असले पाहिजे, याची निवड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.या गुरुवारपासून पुढील चार दिवस वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्याशी केंद्रीय निरीक्षक वैयक्तिक संवाद साधून 20 ते 21 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल पाठविला जाईल.त्यानंतर 10 मे पर्यंत जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या जातील. असेही आ. वंजारी यांनी स्पष्ट केले.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

“Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it” अशा ओळींसह हा मॅनिफेस्टो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.    देशाच्या राजकारणात सध्या…

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सहाव्या दिवशी अभिनेता विजय यांच्या टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षासाठी सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.…

Leave a Reply

You Missed

या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग Petrol Diesel Price Hike

या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महाग Petrol Diesel Price Hike

“कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

“कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण