संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात;
ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

ठाणे,दि.१५ एप्रिल
देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेले ‘संघटन सृजन अभियान’ ठाणे शहरात सुरू झाले आहे.
‘संघटन सृजन अभियान’ या अभियानाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद, यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस, संघटन सृजन कोकण प्रभारी गुरुबिंदरसिंग बच्चर ही मंडळी ठाणे दौऱ्यावर आले आहेत. या पथकाने बुधवारी ठाणे कांग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदीसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी, कशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबविण्यात येईल याबाबत विस्तृत माहिती दिली. जावेद यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने वर्ष 2025- 2026 संघटनेसाठी समर्पित केले असून अखिल भारतील स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय पथक ठाण्यात आले असून पुढील चार पाच दिवस प्रत्येक मतदारसंघात व ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्थरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. या माध्यमातून आगामी काळात संघर्ष करणारे नेतृत्व निवडले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
तर आमदार अतुल वंजारी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सर्व राज्यभर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहेत. प्रदेश व शहर पदाधिकारी, विविध सेल, ब्लॉक व ब्लॉकस्तरीय सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक स्वरूपात संवाद साधून मते जाणून घेण्यात येतील. नवीन जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी कशा पद्धतीचे असले पाहिजे, याची निवड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.या गुरुवारपासून पुढील चार दिवस वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्याशी केंद्रीय निरीक्षक वैयक्तिक संवाद साधून 20 ते 21 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल पाठविला जाईल.त्यानंतर 10 मे पर्यंत जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या जातील. असेही आ. वंजारी यांनी स्पष्ट केले.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप! प्रतिनिधी -संदेश घोलप, नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत भव्य प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘नंदनवन’वर ऐतिहासिक सोहळा दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना…

मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

प्रवाशांच्या समस्यांवर मनसेची भूमिका आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. स्थानकावर छताची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता,…

Leave a Reply

You Missed

उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

उधारीचे पैसे मागितले म्हणून दुकान मालकाचा हातच मोडला,महाड शहरातील घटना,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव