संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात;
ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

ठाणे,दि.१५ एप्रिल
देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असलेले ‘संघटन सृजन अभियान’ ठाणे शहरात सुरू झाले आहे.
‘संघटन सृजन अभियान’ या अभियानाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद, यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस, संघटन सृजन कोकण प्रभारी गुरुबिंदरसिंग बच्चर ही मंडळी ठाणे दौऱ्यावर आले आहेत. या पथकाने बुधवारी ठाणे कांग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदीसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी, कशा पद्धतीने संघटन सृजन अभियान राबविण्यात येईल याबाबत विस्तृत माहिती दिली. जावेद यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने वर्ष 2025- 2026 संघटनेसाठी समर्पित केले असून अखिल भारतील स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय पथक ठाण्यात आले असून पुढील चार पाच दिवस प्रत्येक मतदारसंघात व ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्थरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. या माध्यमातून आगामी काळात संघर्ष करणारे नेतृत्व निवडले जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
तर आमदार अतुल वंजारी यावेळी म्हणाले की, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सर्व राज्यभर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहेत. प्रदेश व शहर पदाधिकारी, विविध सेल, ब्लॉक व ब्लॉकस्तरीय सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक स्वरूपात संवाद साधून मते जाणून घेण्यात येतील. नवीन जिल्हा अध्यक्ष व अन्य पदाधिकारी कशा पद्धतीचे असले पाहिजे, याची निवड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत.या गुरुवारपासून पुढील चार दिवस वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांच्याशी केंद्रीय निरीक्षक वैयक्तिक संवाद साधून 20 ते 21 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल पाठविला जाईल.त्यानंतर 10 मे पर्यंत जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या जातील. असेही आ. वंजारी यांनी स्पष्ट केले.

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

उदगीर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर / उदगीर महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एक वादग्रस्त घटना…

लोकवर्गणीतून निवडणूक, जनतेसाठी संघर्ष; वॉर्ड 86 मध्ये CPI(M) उमेदवार मैदानात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M)

लोकवर्गणीतून निवडणूक, जनतेसाठी संघर्ष; वॉर्ड 86 मध्ये CPI(M) उमेदवार मैदानात मुंबई | प्रतिनिधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) ही गेल्या अनेक दशकांपासून कामगार, वंचित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारा…

Leave a Reply

You Missed

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

  • By Admin
  • March 18, 2026
लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण  सन्मानित