श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

श्रीवर्धन.
श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

प्रतिनिधी -संदेश घोलप,
नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत भव्य प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘नंदनवन’वर ऐतिहासिक सोहळा
दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना मोठा हादरा; आगामी निवडणुकांपूर्वी नव्या शक्तिसंतुलनाची नांदी
​या घडीची सर्वात मोठी, खळबळजनक आणि अधिकृत बातमी थेट मुंबईतून समोर येत आहे! दक्षिण रायगडच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय भूकंप अखेर आज प्रत्यक्षात येत आहे.
​गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट अतुल चौगुले आज संध्याकाळी अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करत आहेत! उद्धव ठाकरे गटाला हा दक्षिण रायगडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे!

शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा महाड विधानसभेचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक राजकीय मोर्चेबांधणी पूर्ण झाली आहे.
​आज मंगळवार, दिनांक २३ जून रोजी संध्याकाळी, मुंबईतील उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘नंदनवन’ बंगल्यावर हा हायव्होल्टेज सोहळा पार पडणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. अतुल चौगुले आणि त्यांचे शेकडो कट्टर समर्थक आज अधिकृतपणे हाती धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
​या ऐतिहासिक सोहळ्यासाठी रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे आणि दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर यांच्यासह श्रीवर्धनमधील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

ॲड. अतुल चौगुले हे केवळ श्रीवर्धन शहरापुरते मर्यादित नसून, संपूर्ण तालुक्यात व मतदार संघात एक सुशिक्षित आणि दांडगा जनसंपर्क असलेला चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी उद्धव ठाकरे गटातून थेट सत्ताधारी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठी पडझड सहन करावी लागणार आहे. आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर या प्रवेशामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून, स्थानिक पातळीवर शिवसेनेचे पारडे कमालीचे जड झाले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    प्रवाशांच्या समस्यांवर मनसेची भूमिका आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. स्थानकावर छताची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता,…

    “कोकरेज पक्ष”च्या मॅनिफेस्टोची देशभर चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांना जनतेचा पाठिंबा

    “Read it once. Read it twice. Then send it to someone who needs to read it” अशा ओळींसह हा मॅनिफेस्टो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.    देशाच्या राजकारणात सध्या…

    Leave a Reply

    You Missed

    श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

    श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

    लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश