निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

आजकाल सगळेचजण आपापल्या आयुष्यात इतके व्यस्त आहेत की एकमेकांशी बोलण्यासाठी, भेटण्यासाठीही वेळ नाही आहे. पण या व्यस्त आयुष्यात जर आपल्या मृत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही वेळ न मिळणं यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय असू शकतं. होय, हे घडलं आहे हरियाणातील सोनीपत येथे. येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने समाजमन हेलावून टाकलं. यामुळे वृद्ध पालकांचे वाढते एकाकीपण आणि बदलते कौटुंबिक संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

निर्दयीपणाचा कळस

ज्या मुलींना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन स्वावलंबी बनवले आणि त्यांच्या प्रत्येक स्वप्नासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, त्याच मुलींना वडिलांच्या अखेरच्या क्षणी भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही. हरियाणातील सोनीपतच्या वेस्ट रामनगर परिसरातील एका वृद्धाश्रमात राहणारे 74 वर्षीय शिवचरण गुप्ता यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. वृद्धाश्रम प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या सुमारे 20 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. याची माहिती वेळोवेळी त्यांच्या मुलींना देण्यात आली होती. मात्र, कोणतीही मुलगी त्यांना भेटण्यासाठी आली नाही.

वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

वृद्धापकाळात मुलींनीच आपल्या वडिलांना दूर लोटलं.वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आणि तिथंच मुलींची वाट बघत वडिलांनी प्राण सोडले. त्यांच्यावर अंत्यसंस्काराला येण्यासाठीही मुलींना वेळ नव्हता. वृद्धाश्रम संचालकांनी फोन केल्यावर त्यांना रुपये पाठवले आणि अंत्यसंस्कार उरकून घ्या असं सांगण्यात आलं. वडिलांच्या अस्थी नेण्यासाठीही मुली आल्या नाहीत. सोनीपतच्या शिवचरण गुप्ता यांच्यावर अंत्यसंस्कार आणि अस्थी विसर्जनाची जबाबदारी वृद्धाश्रमानेच पार पाडली.

मुलींना शेवटचं एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती

शिवचरण गुप्ता हे पूर्वी कपड्यांचे व्यापारी होते. पत्नीसोबत ते वृद्धाश्रमात राहायला आले होते. तेव्हा काही काळाने पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर ते एकटेच वृद्धाश्रमात राहत होते. आजारपणात असताना त्यांना आपल्या मुलींना शेवटचं एकदा पाहण्याची तीव्र इच्छा होती. मात्र ती इच्छा अपुरीच राहिली आणि मुलींची वाट पाहत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवचरण गुप्ता यांना मुलगा नव्हता. त्यांनी आपल्या तीनही मुलींचे प्रेमाने संगोपन केले. त्यांना चांगले शिक्षण दिले आणि स्वावलंबी बनवले. त्यापैकी दोन मुली शिक्षिका झाल्या. मात्र, वडिलांच्या निधनानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने संपर्क साधला असता, मुलींनी वेळेअभावी येणे शक्य नसल्याचे सांगितल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.


व्हिडिओ कॉलवर पाहिला अंत्यसंस्कार

वृद्धाश्रम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी स्वतः येण्याऐवजी अंत्यसंस्काराचा खर्च म्हणून ५१०० रुपये पाठवले आणि अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवण्याची विनंती केली.अंत्यसंस्काराची प्रक्रिया त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्याचे सांगितले जात आहे.

कुटुंबातील कोणीही उपस्थित नसल्याने वृद्धाश्रमातील कर्मचारी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत शिवचरण गुप्ता यांची अंत्ययात्रा काढली. सर्व धार्मिक विधी पार पाडत त्यांनी मुलाचे कर्तव्य निभावले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

अस्थीही नेण्यास मुलींचा नकार

अंत्यसंस्कारानंतरही मुलींनी वडिलांच्या अस्थी घेण्यासाठी येणार नसल्याचे सांगितलं. त्यांनी त्या अस्थी गंगेत विसर्जित करण्याची विनंती त्यांनी वृद्धाश्रम प्रशासनाला केल्याची माहिती समोर आली आहे. मुलांपेक्षा मुलींना आपल्या पालकांची काळजी असते, प्रेम असतं असं म्हणतात पण या प्रसंगानंतर खरंच आता मुली आणि मुले वेगळी आहे का? असा प्रश्न पडतो.

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीकाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण सध्या चर्चा होतेय…

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा करण्यात आला होता मात्र अवघ्या १८ ते २० दिवसांतच या दाव्याची धूळधाण उडाली आहे. उद्घाटनानंतर तब्बल ८४ ठिकाणी रस्ता खचल्याने या हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर गंभीर…

    Leave a Reply

    You Missed

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

    मुलांना शाळेत पाठवू नका! मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी

    मुलांना शाळेत पाठवू नका! मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी

    राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    राज्यात पावसाचा जोर कायम; मुंबई, पुणे, नाशिकमधील धरणे ओव्हरफ्लो, विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

    अमेरिकेसारखा हायवे करण्याचा दावा,उद्घाटनानंतर २० दिवसांतच ८४ ठिकाणी रस्ता खचला; भाजप खासदाराच्या भावाच्या कंपनीकडे होतं कंत्राट

    ‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

    ‘माझा डेटा,माझी जबाबदारी’! अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन, डिजिटल युगात सजग राहण्याचे धडे

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    शिवसेना पक्ष-चिन्ह विवाद; अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं विधान; ठाकरे गटातर्फे सिब्बल यांचा मोठा युक्तिवाद

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं

    अभिजीत दीपकेची मोठी घोषणा! देशभरात राबवणार ‘ही’ रणनीती; CJP मुळे सरकारचं टेन्शन वाढलं