काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

मुंबईच्या काळाचौकी येथील गणेशोत्सवाला गालबोट लागेल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात काळाचौकी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तात्पुरत्या स्टॉलजवळ उभ्या असलेल्या काही लहान मुला-मुलींना मध्यरात्री अचानक विजेचा धक्का लागल्यानं मोठी खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत 8 ते 20 वयोगटातील पाच मुले आणि किशोरवयीनांना विजेचा धक्का बसला आहे. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

अचानक मंडपात विद्युत प्रवाह

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा भीषण अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला. रात्रीची वेळ असली तरी मंडप परिसरात भाविकांची उपस्थिती होती. अचानक मंडपात विद्युत प्रवाह पसरल्याने गोंधळ उडाला आणि दोन मुले तसेच तीन मुलींना विजेचा धक्का बसला.ही घटना घडताच मंडपात एकच गोंधळ उडाला आणि तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले.

मृत्यूचा आकडा 2 वर

अपघातानंतर त्वरित सर्व पाचही जखमींना उपचारासाठी भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी आठ वर्षीय मुलीला मृत घोषित केले.तर आता काळाचौकी येथील घटनेत मृत्यूचा आकडा 2 वर गेला. सुजाता बलराज थोतेटी ( 33 वर्ष )तर दुसरी रागिनी ( 8 वर्ष ) यांचा मृत्यू झाला. तर 3 जणांवर उपचार सुरू आहेत.

आयसीयूमध्ये उपचार सुरु

दरम्यान, मसीना रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वरित तीन जखमींची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद घेत प्रशासनाने तपास सुरू केला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना आणि विजेच्या जोडणीची काळजी घेण्याची गरज या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

, नक्की काय घडल? याचा तपास सुरु

अग्निशमन दल, स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. नक्की काय घडले याचा तपास हा पोलिसांकडून केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात लोक मोठ्या संख्येने गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यातच ही घटना घडल्याचे कळतंय. मात्र, नक्की काय घडले याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही. सध्या काहींवर उपचार सुरू आहेत.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईत दर रविवारी उपगनरीय रेल्वे मार्गावर काही तासांसाठी ब्लॉक घेतला जातो. रुळ, सिग्नल दुरुस्ती तसच अन्य कामांसाठी हा ब्लॉक असतो. ब्लॉकच्या काळात काही नियमित धावणाऱ्या लोकल रद्द केल्या जातात किंवा…

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोली बसस्थानकातून चामोर्शी जाण्यासाठी निघालेल्या बसचा शिवनी येथील नवीन पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.बसची स्टेअरिंग जाम झाल्याने बस पलटी झाल्याचं बोललं जात आहे. गडचिरोली डेपोतून एमएच-०६-८८४८ क्रमांकाची…

    Leave a Reply

    You Missed

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    काळाचौकीतील काळा दिवस! प्रसिद्ध काळाचौकी महागणपती मंडळाजवळ विजेचा धक्का लागून दुर्घटना, मृत्यूचा आकडा २ वर

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य-पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगा ब्लॉकबाबत महत्त्वाचा निर्णय; गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे लोकलच्या वेळापञकात बदल

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    गडचिरोलीत एसटी बसचा भीषण अपघात; स्टेअरिंग जाम झाल्याने बस पुलाजवळ पलटी, ३८ प्रवासी जखमी

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    UPI वर कोणाला GST द्यावा लागणार अन् कोणाला सूट मिळणार? १५ ऑक्टोबरपासून काय बदलणार?

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार