लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनचा यशस्वी दौरा आटोपून मुंबईत परतले. माञ आता त्या प्रवासातील एका प्रसंगाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. तो प्रसंग म्हणजे मुंबईला येताना ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच एकनाथ शिंदेंचा विसरलेला आयफोन. ते विमानतळावरून घरी पोहोचल्यानंतर मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांच्याजवळ मोबाईल नसल्याचे लक्षात आलं.

एकनाथ शिंदे त्यांचा मोबाईल फोन चक्क विमानात विसरले

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लंडन दौऱ्यावर गेले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांना तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात ब्रिटीश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस’मध्ये ‘कॉमनवेल्थ लिडरशीप रेकग्नेशन’, ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप’ आणि महाराष्ट्र मंडळाच्यावतीने ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्कारांचा समावेश होता. या लंडन दौऱ्यावरून 12 सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे हे मुंबईत परतले. मात्र लंडन ते मुंबई असा प्रवास ज्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून त्या प्रवासादरम्यान एकनाथ शिंदे त्यांचा मोबाईल फोन चक्क विमानात विसरले. घरी आल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा फोन परत मिळवण्यासाठी यंत्रणांची धावाधाव सुरु झाली.

घरी पोहोचल्यानंतर पहाटे 3 वाजताच्या सुमारास मोबाईल नसल्याचं लक्षात आलं

एकनाथ शिंदे लंडन दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरी पोहोचल्यानंतर पहाटे 3 वाजताच्या सुमारास मोबाईल नसल्याचे लक्षात आले. सुरक्षाव्यवस्थेतील पोलिसांनी तातडीने धावपळ केली. ब्रिटिश एअरवेजच्या विमानतळावरील सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधल्याचं म्हटलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयातून मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा मोबाईल गहाळ झाला होता.

मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावाधाव

माञ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोबाईल विमानात विसरल्याने यंत्रणांची धावाधाव झाली होती. विमानतळावरून निघाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली. विमानतळावरील ब्रिटिश एअरवेजच्या सुरक्षा कार्यालयाशी पोलिसांनी संपर्क साधला. पहाटे 4 वाजता पोलिसांनी धावपळ करून शिंदे यांचा मोबाईल विमानातून शोधून आणला. यापूर्वीही शिंदे यांचा मोबाईल गहाळ झाल्याची घटना घडली अशी माहिती समोर आली होती. दरम्यान या मोबाईल गहाळच्या चर्चेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयातून मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लंडनच्या रस्त्यावर वडापावचा आस्वाद

5 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या खास सहकाऱ्यांसह आठवड्याच्या लंडनच्या दौऱ्यावर गेले होते.तसेच तेथील कार्यक्रमांमध्ये तीन पुरस्कार शिंदे यांना प्रदान करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदेंनी इंग्रजीमध्ये केलेलं भाषणही चांगलंच चर्चेत आलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत लंडनच्या रस्त्यावर वडापावचा आस्वाद घेतला होता त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.त्यानंतर एकनाथ शिंदे 12 सप्टेंबर रोजी मुंबईत परतले.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

    Leave a Reply

    You Missed

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?