सध्या राज्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरण खूपच चर्चेत आहे. या प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात आली असून आता सीबीआयमार्फत या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी सीबीआयला जबाब दिला असून आपल्या जबाबात माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य बड्या नेत्यांची नावे घेतली आहेत. दरम्यान, या जबाबावरून सीबीआयने गुन्हा दाखल केलाय.
त्यामुळे आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह अनेक बड्या नेत्यांची नावे देखील समाविष्ट आहेत. हा गुन्हा दाखल होताच शिंदे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. दरम्यान आता याच आरोपांवर खुद्द आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय.”मी आयुष्यात कधीही दिशा सालियान यांना भेटलेलो नाही. मी त्यांना ओळखतही नाही, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलंय.”
‘दिशा सालियान यांना कधीच भेटलो नाही’
“मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती, असं सांगत राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे” असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
‘खोटं कॅम्पेन राबवने दुर्दैवी आहे’
तसेच, “कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं सततचं खोटं कॅम्पेन राबवने दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या” अशी मागणीही त्यांनी केलीय.
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 16, 2026
खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकत नाही
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे, असा इशारा देत सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील” असं म्हणत त्यांनी निर्धार त्यांनी व्यक्त केला.








