रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा. गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात ठाकरे गटाची जी जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामागे संजय मानाजी कदम यांचे आक्रमक नेतृत्व आणि सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा थेट संवाद हेच मुख्य कारण ठरत आहे.

आक्रमक आंदोलनाने रोखले लक्ष

या राजकीय वातावरणाची खरी सुरुवात झाली ती कोकणातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दयनीय अवस्थेविरोधात केलेल्या आंदोलनापासून. संजय मानाजी कदम यांच्या नेतृत्वात झालेल्या आक्रमक रस्ता रोको आणि निदर्शनांमुळे प्रशासनाची झोप उडाली आणि कोकणवासीयांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली गेली.

संजय मानाजी कदम यांनी कामाचा वेग मंदावू दिला नाही

त्यानंतर थेट जनतेशी संवाद साधणारे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा रायगड दौरा पार पडला. या दौऱ्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. पण त्या दौऱ्यानंतरही संजय मानाजी कदम यांनी कामाचा वेग मंदावू दिला नाही. त्यांनी जनतेच्या समस्या जाणूून घेण्यासाठी सर्व प्रयत्न सुरुच ठेवले.

संजय मानाजी कदम यांनी रायगड जिल्हा अक्षरशः पिंजून काढला

गुहागर ते श्रीवर्धन सर्वच भागांची पाहणी केली, अगदी दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी केली. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर संजय मानाजी कदम यांनी संपूर्ण रायगड जिल्हा अक्षरशः पिंजून काढला आहे. गुहागर, माणगाव, महाडपासून ते थेट श्रीवर्धनपर्यंतच्या गावागावांत आणि घरोघरी ते पोहोचले आहेत.

जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी घेतला पुढाकार

विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या काळात रात्री एक-दोन वाजेपर्यंत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. या भेटी केवळ औपचारिक किंवा निवडणुकीपुरत्या मर्यादित नव्हत्या.तर जनतेच्या अडचणी आणि दैनंदिन समस्या स्वतः जाणून घेण्यासाठी घेतलेला हा थेट पुढाकार होता.

ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान

संजय मानाजी कदम यांनी या दौऱ्यादरम्यान पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा जाहीर सत्कार केला. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या वरिष्ठ आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा त्यांनी घरोघरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच व त्यांचे आशीर्वाद घेतले.

 

शिवसेना शाखा नव्याने उभ्या करण्याचा संकल्प

एवढंच नाही तर अनेक ठिकाणी दुर्लक्षित किंवा निष्प्रभ झालेल्या शिवसेना शाखांचे पुनरुज्जीवन करण्याचा ठाम संकल्प त्यांनी केला आहे.राजकीय उलथापालथीमुळे मोडकळीस आलेल्या शिवसेना शाखा नव्याने उभ्या करण्याचा संकल्प त्यांनी केला. ‘गाव तिथे शाखा, शाखा तिथे प्रमुख’ या सूत्रावर भर देत त्यांनी रायगड जिल्ह्यात मजबूत संघटनात्मक जाळे विणण्यास सुरुवात केली आहे.

रस्त्यांची पाहणी अन् अडचणींची नोंद

दौऱ्यादरम्यान संजय मानाजी कदम यांनी केवळ राजकीय भाषणे न देता नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि स्थानिक खेळाडूंच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेतल्या. अनेक ठिकाणी बिकट झालेल्या रस्त्यांची स्वतः पाहणी करून प्रत्येक समस्येची गांभीर्याने नोंद घेतली.

युवा पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा

त्यांच्या या सातत्यपूर्ण संपर्कामुळे आणि जमिनीवर उतरून काम करण्याच्या धडपडीमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा पदाधिकाऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि मोठा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस…

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनचा यशस्वी दौरा आटोपून मुंबईत परतले. माञ आता त्या प्रवासातील एका प्रसंगाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. तो प्रसंग म्हणजे मुंबईला येताना ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच एकनाथ…

    Leave a Reply

    You Missed

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब