अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबईत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच अमित शहा हे मुंबई विभागीय भाजप आणि प्रदेश भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेत राजकीय आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी काय आहे प्लान 

सकाळी 11 वाजता नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे अमित शहांच्या हस्ते अधिकृतरित्या उद्‌घाटन करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या संस्थेचं नवीन कार्यालय बांधण्यात आलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला सहकार आमि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर, तसेच मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देखील ते हजेरी लावणार आहे. दोन्ही कार्यक्रमांत सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधणार असल्याचे कळतंय. या दौऱ्यादरम्यान राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे.

अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता विमानाने मुंबईत पोहोचले. मुंबई अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं. शहा यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झालं, त्यावेळी स्वागताला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा देखील होते.

पुण्याचा दौरा विरोधकांच्या आंदोलनामुळे चर्चेत

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते.त्यांच्या पुण्याचा दौरा विरोधकांच्या आंदोलनामुळे चर्चेत राहिला. पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने अमित शहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान आंदोलन केलं. तसेच त्यांनी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात अमित शहा यांनी देशातील घडामोडींवर भाष्य केलं नव्हतं. परंतु आता मुंबईतील दौऱ्यावर देशातील घडामोडींवर काय भाष्य करतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या…

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

    Leave a Reply

    You Missed

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी