भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला अनुकूल वातावरण असून. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.
15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. देशभरात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार तर, मुंबईतही राहणार पावसाचा जोर
हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी हवामानाचे इशारे जारी केले असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज मुंबईत दाट रिमझिम पावसाची शक्यता ९९% वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान २९°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान २६°C राहण्याचा अंदाज आहे.
तसेच ९ ऑगस्ट रोजी विशेषतः १२ वाजण्याच्या सुमारास, आकाशात थोडी मोकळीक दिसेल, परंतु पावसाची शक्यता ९९% कायम राहील. दुपारी ३ वाजता पावसाचा जोर वाढण्याची आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो हलका होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, रात्री ९ नंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, गोदिंया, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच काही भागात 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते. यासोबतच जोरदार पाऊसही असेल. मात्र, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही राज्यांत गारपिटीचीही शक्यता आहे. जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे पडू शकतात. गारपिटीचा इशारा देण्यात आला. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले
मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. जायकवाडी धरणातील भरलेल्या पाण्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आणि उद्योगावरील संकट आता पूर्णत टळले आहे.
दरम्यान भारतात राजस्थानच्या अनुपगढपासून दिल्ली, सिंधी ते पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.








