10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार हा भूकंप रात्री 10 वाजून 1 मिनिटाच्या सुमारास झाला. नाशिकमध्ये शनिवारी रात्री अचानक झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. याआधी देखील 6 ऑगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर 25 जुलैपासून आतापर्यंत 22 वेळा नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं समोर आलंय.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 होती

८ ऑगस्ट रोजी रात्री जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 असून नाशिक शहरातील सातपूर, इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा परिसरासह शहराच्या विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरापर्यंत काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.

घरांमध्ये भांडी आणि वस्तू पडल्याच्या घटना

भूकंपाच्या धक्क्यामुळे काही घरांमध्ये भांडी आणि वस्तू पडल्याच्या घटना घडल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर काही इमारतींमध्ये लिफ्टमध्ये असताना नागरिकांना भुकंपाचे धक्के जाणवले.लिफ्ट सुरळीत सुरु असतानाच अचानक इमारतीला तीव्र हादरे बसू लागल्याचं नागरिकांनी सांगितलं.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

भूकंपाच्या या धक्क्यांमुळे नाशिक जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही,अशी माहिती समोर येत आहे. मात्र, असे असले तरी कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.तसेच भूकंपाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अधिकृत सूचनांचे पालन करावे

मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता वाढवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे लहान मुलां तर याचं योग्य ज्ञान असणं फार महत्त्वाचं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुले व विद्यार्थ्यांना डिजिटल…

    Leave a Reply

    You Missed

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

    निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी