समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आल्यापासून या महामार्गाबद्दल कायम काही ना काही अडचणीच ऐकायला मिळाल्या आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि कमी वेळात अधिक अंतर गाठता यावे यासाठी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बनवण्यात आला होता. मात्र कधी अपघात तर कधी येथील समस्यांमुळेच हा महामार्ग अधिक चर्चेत असतो. समृद्धी महामार्गावर आवश्यक सुविधाही नसल्यामुळे नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.

बऱ्याच वेळेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

जसं, अनेक रस्त्यावर कठडे लावून ठेवले जातात. तर थोड्या चुकांसाठीही प्रवाशांची अडवणूक केली जाते. त्यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमध्ये अनेकदा वाद होतो. असाच काहीसा वादाचा प्रकार रविवारी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर घडला. यामुळे ट्रक चालकाने चक्क त्याचा मोठा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा केला. यामुळे अनेक काळ वाहतूक कोंडी झाली होती.

नेमकं काय घडलं?

समृद्धी महामार्गावर एका ट्रकचालकाने चक्क ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा लावून चावी घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६० जवळ घडली.

संतापलेल्या चालकाने थेट त्याचा ट्रक महामार्गावरच आडवा लावला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचालकाचा आरटीओच्या अधिकाऱ्यांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या चालकाने थेट त्याचा ट्रक महामार्गावरच आडवा लावला आणि वाहनाची चावी घेऊन तेथून निघून गेला. ट्रक आडवा असल्याने महामार्गावरील एका मार्गाची वाहतूक पूर्णपणे जाम झाली. तब्बल दीड तासापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे. अचानक वाहतूक थांबल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. घटनास्थळी वाहनांच्या रांगा वाढतच होत्या. मोठ्या कष्टाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

आरटीओसोबतचा चालकाचा वाद पण इतरांना मनस्ताप 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक चौधरी आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आलं. चालक नेमका कुठे गेला आणि आरटीओसोबत त्याचा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.या वादामुळे इतर प्रवाशांना मात्र हाकनाक मनस्ताप सहन करावा लागला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार