धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

धाराशिवमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील तेरखेडा गावात जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या दोन्ही गटात तुफान राडा झाला. एवढंच नाही तर या राजकीय वादातून झालेल्या दोन गटात दगडफेकही झाली आणि इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थार यांसारख्या 10 ते 12 आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी दोन्ही गटांतील ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमनेसामने

आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमने- सामने आले. आमदार तानाजी सावंत गटातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा उन्माद चढला आहे. या राजकीय गर्वातूनच सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणला आणि गाड्यांची तोडफोड केली, असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तथा मोटे गटाने केलानं केला आहे.

दोन्ही गटाचे विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरून राडा

तर विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव जुन्या प्रस्थापितांना पचवता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वारंवार वाद उकरून काढत आहेत. हा सर्व प्रकार माजी आमदार राहुल मोटे यांच्या सांगण्यावरूनच घडवून आणला जात आहे. इतकेच नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्याच गाड्या फोडून आमच्यावर खोटे आरोप केले आहेत, असा प्रत्यारोप सावंत गटाने केला आहे.

दोन्ही गटांच्या ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या नसल्याने पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून तक्रार दाखल केली. पोलिसांकडून दोन्ही गटांच्या ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या हिंसक घटनेनंतर दोन्ही बाजूंपैकी कोणीही अधिकृतपणे परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी पुढे आले नाही. घटनेतील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष शोध मोहीम सुरू केली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तेरखेडा गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    भष्टाचार प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतोय. मग ती कोणती नोकरी असो किंवा कोणती परीक्षा. घोटाळेबाज सगळीकडेच असतात. पण नेहमी इतरांचे घोटाळे आणि गुन्हे उघडकीस आणणारेच घोटाळेबाज निघाले तर. होय, मुंबई पोलिस…

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    मुंबई ते नाशिक महामार्गाची पावसाने अक्षरश: चाळण झाली असून या महामार्गावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे.याचचं एक जिवंत उदाहरण म्हणजे नुकताच शहापूरच्या भारंगी नदी…

    Leave a Reply

    You Missed

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    १७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई