कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावरून सुरू झालेली आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत धडकलेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ सध्या देशातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. इन्स्टाग्रामवरून थेट रस्त्यावरील लढाईत उतरलेल्या या पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाचे देशभरात पडसाद उमटले आहेत. 12 वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना करणं जे जमलं नाही, ते कॉकरोच जनता पार्टीने करुन दाखवलं. देशाच्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. एका अर्थाने या आंदोलनाने इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. पण या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. त्याबद्दल सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे.याबद्दल पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जो निर्णय आहे तो स्पष्टच सांगून टाकला आहे.

अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठक

याबबात अभिजीत दीपकेच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्वाची बैठकही सुरु आहे. अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये रहायला आहेत. पार्टीची पुढच्या रणनिती काय असणार आहे हे ठरवण्यासाठी अभिजीत दीपकेनं ही बैठक बोलावली असल्याचं म्हटलं जातं.या बैठकीआधी त्याने मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्याला विचारलं की, कॉकरोच जनता पार्टी निवडणूक रिंगणात उतरणार का? त्यावर त्याने सध्या काय ठरलय ते स्पष्टपणे सांगून टाकलं.

देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता…

“मला असं वाटतं की, प्रसारमाध्यमांना जास्त उत्सुक्ता लागली आहे की आम्ही राजकीय पक्ष बनवावा.या देशात जेवढे राजकीय पक्ष आहेत, मला वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्यापासून निराश आहात. आम्हाला ही सामाजिक चळवळच अशीच ठेवायची आहे. देशातली सध्या राजकीय स्थिती पाहता अजून एक राजकीय पक्ष बनवून काय करणार?” असा सवाल अभिजीतने विचारला.

राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे

“लोकांचा राजकारणावरचा विश्वास उठत चालला आहे. सकाळी लोक एकाला मतदान करतात, संध्याकाळी सरकार दुसऱ्या पक्षाचं बनलेलं असतं. सकाळी एक आमदार नंतर खासदार बनतो, संध्याकाळी तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो” असं म्हणत अभिजीत दीपके पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांची संख्या सध्या वाढत चाललेली दिसत आहे. तसेच राजकीय पक्ष न बनता सामाजिक चळवळ म्हणून काम चालू ठेवण्याचा निर्धार असल्याचं अभिजीत दीपकेनं म्हटलं आहे.

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार