भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या दहाव्या दिवशी, शनिवारी, भारताने आठ सुवर्णपदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 1 जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला आहे. भारतीय बॉक्सर्संनी रिंगमध्ये असा काही धुमाकूळ घातला की,अवघ्या 9 तासांच्या अवधीत भारताच्या खात्यात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी तब्बल 10 पदके जमा झाली. बॉक्सिंगच्या मैदानात सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारत या स्पर्धेत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकाच आवृत्तीत बॉक्सिंगमध्ये सात सुवर्णपदके जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने पदकतालिकेत आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशा एकूण 38 पदकांसह चौथ्या स्थानी आहे.

भारतासाठी रौप्यपदकांची सुरुवात

भारतासाठी रौप्यपदकांची सुरुवात प्रवीण चित्रवेल याने पुरुषांच्या ट्रिपल जंप स्पर्धेत केली. त्यानंतर बॉक्सिंगमध्ये जादूमणी सिंह याने पुरुषांच्या 55 किलो गटात रौप्यपदक पटकावले. पॅरा अॅथलेटिक्समध्ये शुभम जुयाल याने शॉटपुट प्रकारात रौप्य जिंकून भारताच्या पदकांमध्ये भर घातली. अनुभवी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने महिला 75 किलो गटात रौप्यपदक मिळवले. दिवसातील शेवटच्या बॉक्सिंग अंतिम सामन्यात नरेंदर बेरवाल यालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.त्यानंतर जूडोमध्ये उन्नती शर्मा हिने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकसंख्येत आणखी भर घातली.

अंकुश पंघालने पटकावले सुवर्ण

भारतासाठी दिवसातील शेवटचे सुवर्णपदक अंकुश पंघाल याने जिंकले. पुरुषांच्या 80 किलो गटाच्या अंतिम फेरीत त्याने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 अशा विभाजित निर्णयाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. बॉक्सिंगमध्ये भारताचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी सचिन याने पुरुषांच्या 60 किलो गटाच्या अंतिम फेरीत नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग नदेवेलोचा 3-2 अशा विभाजित निर्णयाने पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.

लव्हलिनाला रौप्यावर मानावे लागले समाधान

महिला 75 किलो गटाच्या अंतिम सामन्यात लव्हलिना बोरगोहेनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या एम्मा सुई ग्रीनट्री हिच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत एम्माने 4-1 अशा विभाजित निर्णयाने विजय मिळवत लव्हलिनाला रौप्यावर समाधान मानावे लागले.

अरुंधतीने जिंकले सुवर्ण

महिला 70 किलो गटात भारताच्या अरुंधती हिने इंग्लंडच्या चेंटेले रीडचा 5-0 अशा एकमताने निर्णयाने पराभव करत शानदार सुवर्णपदक जिंकले. दिवसाची सुरुवात भारतासाठी सुवर्णमयी ठरली. प्रीती पवार हिने महिला 54 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर जैस्मिन लंबोरिया हिने महिला 57 किलो गटात शानदार कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले.

प्रिया घंघासची उत्कृष्ट कामगिरी

महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या प्रिया घंघासने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिने अटीतटीच्या लढतीत ४-१ असा विजय मिळवला.प्रियाने लढतीची जोरदार सुरुवात केली, पण तिची प्रतिस्पर्धी अल-अहमदियेने काही अचूक ठोसे मारून प्रत्युत्तर दिले. अंतिम फेरीत दोन्ही बॉक्सरमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

साक्षीने ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंक

भारताच्या साक्षी चौधरीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकले. तिने इंग्लंडच्या खेळाडूला ५-० ने हरवले.
साक्षीने संपूर्ण लढतीत उत्कृष्ट रणनीतीचा वापर केला. तिने आपल्या डाव्या हाताने प्रतिस्पर्ध्याचे ठोसे अडवले आणि उजव्या हाताने अचूक प्रतिहल्ले केले.

भारताने जिंकली 13 सुवर्णपदके

दिवसाची सुरुवात प्रीती पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून केली. त्यानंतर जस्मिन लँबोरियाने महिलांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दिवसाच्या अखेरीस, भारतीय बॉक्सर अंकुश पांघलनेही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. भारताने या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह एकूण 38 पदके जिंकली आहेत. गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

त्यामुळे एकंदरीतच शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी केली.

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

कोरबा जिल्ह्यातील कटघोरा नगरपालिकेच्या अटल कॉम्प्लेक्समधील माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींचा आरोप आहे की, कांस्य पुतळा बसवण्याऐवजी सिमेंटचा पुतळा बसवून…

पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने हाहाकार उडाला असून, आसाममध्ये मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे, तर नागालँडसह इतर पर्वतीय भागांत भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती…

Leave a Reply

You Missed

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

कॉकरोच जनता पार्टी निवडणूक लढवणार? अभिजीत दीपकेने स्पष्ट सांगितलं; पुढच्या रणनितीसाठी CJP ची बैठक सुरु

१७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

१७८ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललं हसू! मोफत शालेय साहित्याचं वाटप, चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी महत्त्वाचा हात

भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं