भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या दहाव्या दिवशी, शनिवारी, भारताने आठ सुवर्णपदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 1 जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला आहे. भारतीय बॉक्सर्संनी रिंगमध्ये असा काही धुमाकूळ घातला की,अवघ्या 9 तासांच्या अवधीत भारताच्या खात्यात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी तब्बल 10 पदके जमा झाली. बॉक्सिंगच्या मैदानात सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारत या स्पर्धेत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकाच आवृत्तीत बॉक्सिंगमध्ये सात सुवर्णपदके जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने पदकतालिकेत आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशा एकूण 38 पदकांसह चौथ्या स्थानी आहे.

भारतासाठी रौप्यपदकांची सुरुवात

भारतासाठी रौप्यपदकांची सुरुवात प्रवीण चित्रवेल याने पुरुषांच्या ट्रिपल जंप स्पर्धेत केली. त्यानंतर बॉक्सिंगमध्ये जादूमणी सिंह याने पुरुषांच्या 55 किलो गटात रौप्यपदक पटकावले. पॅरा अॅथलेटिक्समध्ये शुभम जुयाल याने शॉटपुट प्रकारात रौप्य जिंकून भारताच्या पदकांमध्ये भर घातली. अनुभवी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने महिला 75 किलो गटात रौप्यपदक मिळवले. दिवसातील शेवटच्या बॉक्सिंग अंतिम सामन्यात नरेंदर बेरवाल यालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.त्यानंतर जूडोमध्ये उन्नती शर्मा हिने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकसंख्येत आणखी भर घातली.

अंकुश पंघालने पटकावले सुवर्ण

भारतासाठी दिवसातील शेवटचे सुवर्णपदक अंकुश पंघाल याने जिंकले. पुरुषांच्या 80 किलो गटाच्या अंतिम फेरीत त्याने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 अशा विभाजित निर्णयाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. बॉक्सिंगमध्ये भारताचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी सचिन याने पुरुषांच्या 60 किलो गटाच्या अंतिम फेरीत नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग नदेवेलोचा 3-2 अशा विभाजित निर्णयाने पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.

लव्हलिनाला रौप्यावर मानावे लागले समाधान

महिला 75 किलो गटाच्या अंतिम सामन्यात लव्हलिना बोरगोहेनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या एम्मा सुई ग्रीनट्री हिच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत एम्माने 4-1 अशा विभाजित निर्णयाने विजय मिळवत लव्हलिनाला रौप्यावर समाधान मानावे लागले.

अरुंधतीने जिंकले सुवर्ण

महिला 70 किलो गटात भारताच्या अरुंधती हिने इंग्लंडच्या चेंटेले रीडचा 5-0 अशा एकमताने निर्णयाने पराभव करत शानदार सुवर्णपदक जिंकले. दिवसाची सुरुवात भारतासाठी सुवर्णमयी ठरली. प्रीती पवार हिने महिला 54 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर जैस्मिन लंबोरिया हिने महिला 57 किलो गटात शानदार कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले.

प्रिया घंघासची उत्कृष्ट कामगिरी

महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या प्रिया घंघासने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिने अटीतटीच्या लढतीत ४-१ असा विजय मिळवला.प्रियाने लढतीची जोरदार सुरुवात केली, पण तिची प्रतिस्पर्धी अल-अहमदियेने काही अचूक ठोसे मारून प्रत्युत्तर दिले. अंतिम फेरीत दोन्ही बॉक्सरमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

साक्षीने ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंक

भारताच्या साक्षी चौधरीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकले. तिने इंग्लंडच्या खेळाडूला ५-० ने हरवले.
साक्षीने संपूर्ण लढतीत उत्कृष्ट रणनीतीचा वापर केला. तिने आपल्या डाव्या हाताने प्रतिस्पर्ध्याचे ठोसे अडवले आणि उजव्या हाताने अचूक प्रतिहल्ले केले.

भारताने जिंकली 13 सुवर्णपदके

दिवसाची सुरुवात प्रीती पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून केली. त्यानंतर जस्मिन लँबोरियाने महिलांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दिवसाच्या अखेरीस, भारतीय बॉक्सर अंकुश पांघलनेही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. भारताने या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह एकूण 38 पदके जिंकली आहेत. गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

त्यामुळे एकंदरीतच शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी केली.

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं…

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार