जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग १

प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे, जिंतूर

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सुरुवातीला  चव्हाळ बांबुंमध्ये असलेले अतिक्रमण आता लोखंडी पत्रा शेडमध्ये आल्याने या अतिक्रमणाचे रूपांतर लवकरच पक्क्या आरसीसी बांधकामात होतो की, काय? असा खोचक सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. या धैर्यशील अतिक्रमणावर कुणाचा वरद हस्त आहे. हे गुपीत मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

 

अधिक माहिती अशी की, जिंतूर तहसील कार्यालयात आजघडीला आत 22 आणि बाहेर 26अशी एकूण 46 दुकाने थाटली आहेत. याशिवाय चारचाकितून झेरॉक्स मशीन व्यवसाय करणारे चार वाहने उभी आहेत. अतिक्रमणाचे अर्धशतक होण्याला केवळ 2 दुकानाची कमतरता असल्याने दिवाळी नंतर आणखी नव्या दोन दुकानाची भर पडणार असून अतिक्रमणाचे अर्धशतक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

🔴 “तू बिनधास्त टपरी टाक, तहसीलदारांच टेंशन घेऊ नको, बाकी मी सांभाळतो”

अतिक्रमण करणारे बरेचजण कोणत्या न कोणत्या राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांचे छुपे हस्तक असल्याने राजकीय पुढाऱ्यांची बरीच बोगस कामे इथून सांभाळली जातात. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम केवळ कागदावरच राहिली आहे. या अतिक्रमण धारकांत बहुसंख्य लोक राजकीय पाठबळाने बसलेले आहेत. “साहेबांचा एक फोन विषय खल्लास ” अशी परिस्थिती आहे.

🔴 नोटीस आली की उचला उचल बाकी जैसे थे

प्राप्त माहितीनुसार सर्व अतिक्रमण धारकांना त्यांची अवैध दुकाने उचलून घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.नोटीस पालनाचा केवळ आदर म्हणून रातोरात दुकाने उचलून बाजूला ठेवली आणि आठच दिवसांत पुन्हा जैसे थे करण्यात आली. त्यामुळे तू मारल्या सारखं कर मी रडल्या सारखं करतो अशीच परिस्थिती आहे.

 

To be continue….

यांना विद्युत पुरवठा कसा होतो

बोगस कामे कशी चालतात याबद्दल आणखी काय घडामोडी आहेत हे पुढील भागात वाचा….

भाग २ वाचण्यासाठी येथे Click करा.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

    सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिंतूर प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच व मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून खून…

    बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा

    सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी जिंतूर प्रतिनिधीबांगलादेशा मध्ये झालेल्या सत्तातरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक 10 डिसेंबर रोज जिंतूर शहरातून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    • By Admin
    • December 18, 2025
    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष