कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले? – मुंबईतील बोरिवली वनक्षेत्रातील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार

भाग एक

मुंबईसारख्या शहरात निसर्गाची शेवटची निशाणी असलेल्या कांदळवन आणि वनक्षेत्रांवर अनधिकृत बांधकामांच्या सावटाने संकट गडद झाले आहे. मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचा पाढा आदिवासी पाड्यातील वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रचंड वाढलेला प्रकार म्हणजे सरकारी व्यवस्थेचा बेशिस्त कारभार व भ्रष्टाचाराची पराकाष्ठा दाखवतो. 

मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचापाढा आदिवासी पाड्यात झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी पाच महिन्यांपूर्वी तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला वनविभाग आणि नगर भूमापन विभागाचे अधिकारी एकत्रित पाहणीसाठी आले. मात्र, त्यानंतर परिस्थिती तशीच राहिली. आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. कधी तहसीलदार गैरहजर, कधी पोलिसांची अनुपस्थिती, तर कधी नगर भूमापन अधिकाऱ्यांची टाळाटाळ – हे सर्व पाहता ही प्रक्रिया मुद्दाम लांबवली जात असल्याचे स्पष्ट होते. 

अधिकारी आणि भू-माफियांचा साटेलोटे?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अधिकारी तक्रारींच्या वेळी दाखवलेला उत्साह नंतर गायब होतो. तक्रार उघड होताच भू-माफियांकडे अधिकारी पळतात आणि त्यांच्याशी संगनमत करून फक्त कागदोपत्री प्रक्रिया चालवतात. यामध्ये खालपासून वरपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे बोलले जाते. 

कांदळवन ही मुंबईसाठी जिवंत रक्षक भिंत आहे, जी पूर आणि हवामान बदलाचा धोका कमी करते. अतिक्रमणामुळे झाडे तोडली जातात, जैवविविधतेचा ऱ्हास होतो आणि परिसरातील स्थानिक लोकांचे जीवनमान बिघडते. यातून आदिवासींचे हक्कही हिरावले जातात. 

जागतिक पर्यावरणीय आपत्तीचा धोका
मुंबईतील कांदळवन हे जागतिक पर्यावरणीय वारसा असलेले स्थान आहे. जागतिक हवामान परिषदांनीदेखील अशा परिसंस्थांचे जतन करण्याचे आवाहन केले आहे. पण स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे हे नैसर्गिक ठेवे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 

संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. 
जर त्वरित उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर येत्या काही वर्षांत मुंबईतील निसर्ग आपली ओळख कायमची गमावेल. आता स्थानिक नागरिकांनी जागे होऊन निसर्ग वाचवण्यासाठी लढा दिला पाहिजे. कारण, “कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले?” हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.
पुढील भागात आपण पाहू कशा पद्धतीने जागेवर अतिक्रमण करून जागा विकली जाते..

पाहा जागृत ,रहा जागृत
जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड,मुंबई

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    वई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी ख्वाहिश २०२५ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्वरूप असलेल्या या…

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    अखेर राज्यातील नागरिकांची गेल्या चार वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे. महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    • By Admin
    • December 18, 2025
    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष