ऑपरेशन सिंदूर: भारताची पाकमध्ये धडक कारवाई; पाकिस्तानात भीतीचे वातावरण, शाळा-विमानतळ बंद

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने ७ मेच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले केले. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय लष्कराच्या अधिकृत निवेदनानुसार, ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केंद्रित होती. पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना कोणतीही हानी पोहोचवलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या २६ नागरिकांचा प्रतिशोध घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

पाकिस्तानात घबराट आणि अनिश्चितता

भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामाबाद, कराची, लाहोर, फैसलाबाद, मुल्तान, स्कार्दू आणि पेशावर येथील विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी विमान वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानमध्ये जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत.

पाकिस्तानातील शाळा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मरयम नवाज यांनी X (पूर्वीचा ट्विटर) वरून माहिती दिली की पंजाब प्रांतातील तसेच इस्लामाबादमधील सर्व शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

पंतप्रधान शहबाज शरीफ यांची तातडीची बैठक

भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज सकाळी राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली. यामध्ये देशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, पुढील धोरणात्मक निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. देशात तणावाचे वातावरण असून सरकार आणि लष्कर दोन्ही अत्यंत सतर्क आहेत.

दहशतवादी केंद्रांवर अचूक लक्ष्य

मुजफ्फराबाद भागात दहशतवाद्यांचे बस्तान उद्ध्वस्त करण्यात आले आहे. येथे दहशतवाद्यांनी वापरत असलेली एक मशीद पूर्णतः नष्ट झाली आहे. या मशिदीत दहशतवादी बैठका आणि नियोजन केले जात होते. भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत गोळीबार सुरू असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत.

पाकिस्तानात असुरक्षिततेची भावना वाढली

पाकिस्तानमध्ये सध्या भीती, संभ्रम आणि अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. सामान्य नागरिकांत अनिश्चितता वाढली आहे. रस्त्यांवर शुकशुकाट, रुग्णालयांमध्ये गर्दी, आणि सीमावर्ती भागात वाढलेली लष्करी हालचाल हे सगळेच चित्र अत्यंत तणावपूर्ण आहे.

 

  • Related Posts

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची चर्चा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के व्यापार…

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे आयोजित बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाड तालुक्यातील भिवघर शाळेचे मुख्याध्यापक व बी.एल.ओ.  रुपेश राजू पार्टे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. दि. ३…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    • By Admin
    • December 18, 2025
    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष