ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींचं पहिलं जाहीर वक्तव्य – “2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल असेल”

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काल मध्यरात्री मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या निर्णयामुळे देशात संतोषाचे वातावरण असून सर्वच स्तरांतून या कारवाईचे जोरदार समर्थन करण्यात येत आहे.

आज सकाळी भारतीय सेनेने पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाममधील हल्ल्याला “क्रूर, भ्याड आणि अमानवीय” ठरवत भारताने ठोस उत्तर दिल्याचे स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर देशवासीयांचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या प्रतिक्रिया कडे लागले होते. सर्वांना वाटत होते की मोदी थेट या कारवाईवर भाष्य करतील, मात्र त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात देशाच्या अंतराळ प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं.

जागतिक अंतराळ परिषदेत मोदींचं भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी जागतिक अंतराळ संशोधन परिषदेत बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात भारताच्या अंतराळ प्रगतीचा आढावा घेतला. त्यांच्या भाषणात थेट ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख नव्हता, परंतु त्यांचा आत्मविश्वास आणि भविष्यातील योजना या कारवाईप्रमाणेच धडाडीच्या होत्या.

“भारताने अंतराळ क्षेत्रात इतिहास घडवला आहे. चंद्रयान-1 च्या माध्यमातून चंद्रावर पाण्याचा शोध लावला. त्यानंतर चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 मोहिमाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या. भारताचा अंतराळ प्रवास हा कुणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर मानवतेच्या भल्यासाठी आहे,” असं मोदी म्हणाले.

2040 पर्यंत चंद्रावर भारतीय पाऊल – मोठी घोषणा

या भाषणात पंतप्रधान मोदींनी एक मोठा आणि ऐतिहासिक दावा केला.

“2040 पर्यंत भारतीय पाऊल चंद्रावर असेल, हे मी आत्मविश्वासाने सांगतो. आणि तो दिवस दूर नाही, जेव्हा भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन असेल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

त्यांनी सांगितलं की भारताच्या गगनयान मोहिमेतील तयारी अंतिम टप्प्यात असून भारतीय अंतराळवीर लवकरच अंतराळात झेप घेणार आहेत. या मोहिमेमुळे भारत केवळ जागतिक महासत्ता नव्हे, तर विज्ञानसत्ता म्हणूनही सिद्ध होईल, असं ते म्हणाले.

महिला वैज्ञानिकांचं नेतृत्त्व आणि टेक्नॉलॉजिकल प्रगती

मोदींनी आपल्या भाषणात भारतीय महिला वैज्ञानिकांचं विशेष कौतुक केलं.

“आमच्या अंतराळ मोहिमांचं नेतृत्व महिला वैज्ञानिक करत आहेत. ही भारताच्या प्रगतीची खरी ओळख आहे,” असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “आज भारताकडे २५० हून अधिक स्पेस स्टार्टअप्स आहेत. एकाच वेळी १०० सॅटेलाईट्स लाँच करण्याचा विक्रम भारताने केला आहे. हे सगळं भारतीय जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी आहे.”

मोदींचं अप्रत्यक्ष संदेश – सामर्थ्य विज्ञानातही आणि संरक्षणातही

पंतप्रधान मोदींनी जरी आपल्या भाषणात एअर स्ट्राईकवर थेट भाष्य केलं नसलं, तरी त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन हा भारत आता केवळ संरक्षणातच नव्हे, तर विज्ञानातही शक्तिमान बनत आहे, हे दर्शवणारा होता. त्यांच्या भाषणातून देशाच्या आत्मनिर्भरतेचा आणि नव-भारताच्या उभारणीचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो.

एकीकडे भारत दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भव्य झेप घेत आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या संरक्षण नीतीची ताकद दिसली आणि मोदींच्या भाषणातून भारताच्या अंतराळ स्वप्नांची झलकही मिळाली.

 

  • Related Posts

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरातील कोंढवा भागात वादग्रस्तपणे बिल्डरला दिलेली ३०…

    भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सहमती; ट्रम्प यांचा मोठा दावा, भारत-पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया

    गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन आशियाई देशांमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीवर आता मोठा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार