भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त, लाहोरचं हवाई छत्र गायब!

नवी दिल्ली | प्रतिनिधी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लाहोर शहराजवळील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची एअर डिफेन्स सिस्टीम – HQ-9 पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. ही माहिती भारतीय लष्कराने अधिकृत प्रेस नोटद्वारे जाहीर केली असून, आता लाहोरच्या सुरक्षेसमोरील हवाई कवचच नष्ट झालं आहे.

पाकिस्तानने चीनकडून मागवलेली HQ-9 ही अत्याधुनिक Surface-to-Air Missile प्रणाली लाहोरच्या संरक्षणासाठी तैनात केली होती. ही यंत्रणा एकाच वेळी 100 टार्गेट्स ट्रॅक करून त्यांचा नाश करण्यास सक्षम होती. मात्र भारताच्या अचूक आणि धडक कारवाईने ती पूर्णपणे निष्प्रभ करण्यात आली आहे. यामुळे भारताला आता लाहोरपर्यंत हवाई कारवायांचं मोकळं रान मिळालं आहे.

HQ-9 प्रणाली ही चीनच्या CPMIEC या कंपनीने विकसित केली असून, ती जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा आहे. पाकिस्तानने 2021 मध्ये ही यंत्रणा आपल्या हवाई ताफ्यात समाविष्ट केली होती. भारताचे राफेल, सुखोई आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र यांसारख्या हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी ही यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला अपयशी ठरवला. भारताच्या “सुदर्शन चक्र” युनिटने सुसज्ज S-400 प्रणालीद्वारे पाकिस्तानकडून आलेली सर्व क्षेपणास्त्रं आणि ड्रोन आकाशातच नष्ट केले.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी आणि कराचीसारख्या शहरांमध्ये सतत सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

भारतीय लष्कराची ही कारवाई ही केवळ सामरिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर तांत्रिक श्रेष्ठतेचंही प्रतीक मानली जात आहे. HQ-9 सिस्टीमचा नाश आणि पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा यशस्वी प्रतिकार यामुळे भारताच्या हवाई ताकदीला अधिक बळकटी मिळाली आहे.

  • Related Posts

    रशियाशी जवळीक अमेरिकेला खुपली, भारतावर 25 टक्के टॅरिफ

    भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची चर्चा असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के व्यापार…

    भिवघरचे बी.एल.ओ. रुपेश पार्टे यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रीय प्रशिक्षण यशस्वी

    भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे आयोजित बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाड तालुक्यातील भिवघर शाळेचे मुख्याध्यापक व बी.एल.ओ.  रुपेश राजू पार्टे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. दि. ३…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    • By Admin
    • December 18, 2025
    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष