डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

डोंबिवली- श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी ६७५ समाधी सोहळा डोंबिवलीत गणपती मंदिर इथे सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात नामदेव महाराजांच्या पूजेने करण्यात आली. डोंबिवली च्या नामदेव शिंपी समाजाच्या महिलामंडळाने सुश्राव्य भजन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले .
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आमदार राजेश मोरे, मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर, सरचिटणीस प्रकाश पवार , सरचिटणीस आशिष राजगौर, भाजपाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राहुल गणपुले, सुनील पवार, किरण पाटील, स्मिता माळवदे, जगदाळे गुरुजी, शिक्षक व समाजसेवक गणेश हिरवे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजा अरण्यात आली. ६५ पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला , १०वी , १२ वी , १५वी , व इतर विशेष शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . तसेच लग्नाची ५० वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचाही सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाला भरीव देणगी देऊन आर्थिक सहकार्य केलेल्या समाजबांधवांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी नामदेव माहाराजांचा इतिहास, त्यांचे कार्य , त्यांची भक्ती यावर माहिती दिली व समाज कल्याणावर मार्गदर्शन केले. शिंपी बिजनेस फोरमच्या कार्यकर्त्यांनीं त्यांच्या फोरम बद्दल कामकाजाबद्दल व आर्थिक बाजू सक्षमीकरण्यासाठी शिंपी बिजनेस फोरम सर्वाना कशी मदत करू शकेल याचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी कमिटी मेंबर्स , कार्यकारी मंडळ, व समाजबांधवानी हातभार लावला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं मौन; 8 दिवसांपासून फक्त ‘हे’च करतायत…

    22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या भ्याड घटनेने संपूर्ण देश संतप्त झाला असून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी…

    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमिर खानचा भावनिक निर्णय…!

    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू