डोंबिवलीत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी समाधी सोहळा

डोंबिवली- श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन संजीवनी ६७५ समाधी सोहळा डोंबिवलीत गणपती मंदिर इथे सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात नामदेव महाराजांच्या पूजेने करण्यात आली. डोंबिवली च्या नामदेव शिंपी समाजाच्या महिलामंडळाने सुश्राव्य भजन करून सर्वाना मंत्रमुग्ध केले .
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आमदार राजेश मोरे, मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर, सरचिटणीस प्रकाश पवार , सरचिटणीस आशिष राजगौर, भाजपाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राहुल गणपुले, सुनील पवार, किरण पाटील, स्मिता माळवदे, जगदाळे गुरुजी, शिक्षक व समाजसेवक गणेश हिरवे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजा अरण्यात आली. ६५ पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला , १०वी , १२ वी , १५वी , व इतर विशेष शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . तसेच लग्नाची ५० वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचाही सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाला भरीव देणगी देऊन आर्थिक सहकार्य केलेल्या समाजबांधवांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी नामदेव माहाराजांचा इतिहास, त्यांचे कार्य , त्यांची भक्ती यावर माहिती दिली व समाज कल्याणावर मार्गदर्शन केले. शिंपी बिजनेस फोरमच्या कार्यकर्त्यांनीं त्यांच्या फोरम बद्दल कामकाजाबद्दल व आर्थिक बाजू सक्षमीकरण्यासाठी शिंपी बिजनेस फोरम सर्वाना कशी मदत करू शकेल याचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी कमिटी मेंबर्स , कार्यकारी मंडळ, व समाजबांधवानी हातभार लावला.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

    मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६ ,द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६’ हा महोत्सव मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठाद्वारे आयोजित ‘अफसाना – द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६’…

    अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे, हे आपले उद्दिष्ट असावे. __ बी. बी. मेश्राम

    फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनची १५३ वी शतकोत्तर वैचारिक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न. छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना)…

    Leave a Reply

    You Missed

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!