डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

डोंबिवलीतील वाहतुकीबद्दल नेहमीच नागरिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. वाहतूककोंडीची समस्या तर नित्याचीच झाली आहे. सोबतच भरधाव वेगात चालणारी रिक्षा असो, कार असो किंवा बाईक. रस्त्यावर वेग मात्र सारखाच असतो. यामुळे एक भयानक अपघात घडला.पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली

भरधाव कारचा थरार

डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरात बुधवारी एका भरधाव कारने विरुद्ध दिशेने येत दोन कार आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली.या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना तळली आहे. मात्र दोन जण किरकोळ जखमी असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवरही झाला.

सर्रास विरुद्ध दिशेने वाहन चालवतात

डोंबिवली-कल्याण शिळ मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.या वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवतात.अशाच प्रकारातून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत संतापले

या मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीसह ‘राँग साईड’ने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी म्हटलंय की, “दररोज वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक नागरिक आणि विद्यार्थी त्रास सहन करतात त्यामध्ये काही मुजोर वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहना घेऊन प्रवास करतात.त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. आज जी घटना घडली यामध्ये वाहनांच्या नुकसान तर झालच आहे.परंतु,पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. वाहतूक कोंडी कशी कमी होणार, याकडे पोलीस प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली पाहिजे. कठोर कारवाई केली पाहिजे”.असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या अपघातानंतर तरी वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वेगमर्यादेबद्दल आणि विरुद्ध दिशेनं वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी…

Leave a Reply

You Missed

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

“सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

“सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

“ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

“ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी