कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या वेळेपासून ते काम करण्यास दिरंगाई करण्यापर्यंत अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत.पण जेव्हा प्रशासनाचा दणका बसतो तेव्हा अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडते. लातूर येथील जिल्हा परिषदेत कर्मचारी नियमितपणे वेळेवर उपस्थित राहत असल्याचे दाखवत ऑनलाईन हजेरी लावून थेट गायब होत असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे पदाधिकारी व प्रशासनाने बुधवारी सकाळी १०.१५ वाजता खरी परिस्थिती पाहण्यासाठी थेट धाड टाकली. या अचानकच्या तपासणीदरम्यान, २० टक्के कर्मचारी आपल्या कार्यालयात उशिरा आल्याचे उघडकीस आले आहे. त्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे.

अचानक तपासणीमुळे कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा समोर

जिल्हा परिषदेच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वा. पर्यंत आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे म्हणून ‘आधार बेस अटेंडन्स सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. मात्र, काही कर्मचारी सकाळी ऑनलाईन हजेरी नोंदवतात अन् गायब होतात. ते आपल्या कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आलं. बुधवारी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी संयुक्तपणे प्रत्येक विभागांस अचानक भेटी देऊन पाहणी केली. यावेळी शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन, पंचायत, अर्थ, आरोग्य, समाजकल्याण, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विभागांची पाहणी केली.

कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु

ऑनलाईन हजेरी लावून कामावर कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी सुरु असल्याचे समजतंय.या तपासणीत कर्मचाऱ्यांच्या हजेरीबरोबर कार्यालयीन स्वच्छतेचीही पाहणी करण्यात आली.

तपासणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

प्रशासनाच्या या अचानक केलेल्या तपासणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वेळेवर आपल्या कार्यालयात उपस्थित नसलेल्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने सांगितले.

तीन दिवसांची मुदत दिली जाणार

जिल्हा परिषदेतील जवळपास २० टक्के कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना आता नोटिसा बजावण्यात येणार आहेत. खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

    डोंबिवलीतील वाहतुकीबद्दल नेहमीच नागरिकांच्या तक्रारी राहिल्या आहेत. वाहतूककोंडीची समस्या तर नित्याचीच झाली आहे. सोबतच भरधाव वेगात चालणारी रिक्षा असो, कार असो किंवा बाईक. रस्त्यावर वेग मात्र सारखाच असतो. यामुळे एक…

    मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

    राज्यातील अनेक गावात आजही स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांनी नेहमीच फरफट होते. म्हणजे माणूस गेल्याचं दु:खापेक्षा मरणानंतरही त्याला कष्ट पडावे या विचारानेच ग्रामस्थांचा संताप होतो. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी किंवा शेड…

    Leave a Reply

    You Missed

    डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

    डोंबिवलीत भरधाव कारचा थरार, तीन वाहनांना जोरदार धडक, वाहतूककोंडी अन् नागरिकांमध्ये घबराहट

    कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

    कामचुकार कर्मचाऱ्यांची बत्ती गुल; प्रशासनाची अचानक धाड अन्… ऑनलाईन हजेरी लावून कर्मचारी गायब

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

    बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

    बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

    मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

    मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित