मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

राज्यातील अनेक गावात आजही स्मशानभूमी नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारावेळी ग्रामस्थांनी नेहमीच फरफट होते. म्हणजे माणूस गेल्याचं दु:खापेक्षा मरणानंतरही त्याला कष्ट पडावे या विचारानेच ग्रामस्थांचा संताप होतो. अनेक गावांमध्ये स्मशानभूमी किंवा शेड नसल्यामुळे मृतदेह उघड्यावर, रस्त्याच्या कडेला, किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात ठेवावे लागतात.
असाच एक प्रकार पाहायला मिळाला आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील मदनापूर येथे. मदनापूरमधील ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत परिसरातच मृतदेहावर अंत्यसंस्कार गेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच वडिलांवर अंत्यसंस्कार

गावात स्मशानभूमीची सुविधा नसल्याने 81 वर्षीय वृद्धावर चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे प्रशासन आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.मदनापूर येथील रामदास पुरुषोत्तम मानकर यांचे निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कारासाठी अधिकृत स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांपुढे मोठा प्रश्न होता. अखेर त्यांचा मुलगा विजय मानकर यांनी संतप्त होत वडिलांवर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे आवारच अंत्यसंस्कार करण्यात आले.

30 गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नाही

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,मदनापूरसह परिसरातील सुमारे 30 गावांमध्ये आजही स्मशानभूमीची सुविधा नाही. अनेक वर्षांपासून निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने करूनही शासन आणि प्रशासनाकडून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे गावात मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे याचाही विचार ग्रामस्थांना करावा लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्देव ते काय असू शकतं.

आता तरी संबंधित प्रशासन जागे होणार का?

एवढंच नाही तर शिवसेना आमदार संजय दरेकर नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून शासनाकडे स्मशानभूमीसाठी जागा व निधीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.मात्र आता या घटनेनंतर तरी राज्य सरकार आणि संबंधित प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

 

 

 

 

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    मराठवाड्यातील नागरिकांसाठी आता गुड न्यूज आहे. रेल्वे प्रवाशांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.  लवकरच मराठवाड्यात ‘वंदे भारत’ धावणार आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड या अत्यंत वर्दळीच्या दुहेरी…

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी आंदोलकांबाबात सुप्रीम कोर्टाकडून चांगलाच झटका मिळाला आहे.वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटले की, दिल्लीतील जंतर-मंतर किंवा कोणत्याही राज्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस सध्या कोणतीही कारवाई…

    Leave a Reply

    You Missed

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

    पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार! आसाममध्ये पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त; मृतांचा आकडा ७५ च्या वर

    बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

    बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रामायण’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार,तारीख जाहिर; चित्रपटाबाबत मोठी घोषणा

    मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

    मृत्यूनंतरही मरणयातना! गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच वडिलांवर अंत्यसंस्कार; ग्रामस्थांचा संताप

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    मराठवाड्यात धावणार ‘वंदे भारत’; केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    CJPच्या आंदोलकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, या लोकांवरील गुन्हे मागे न घेण्याबाबत कोर्टाचा स्पष्टच निर्णय

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    विकृतीचा कळस! भीमराम कांबळेसारखी पुन्हा एक घटना; 60 वर्षाच्या नराधमाचे दोन चिमुकलींवर वारंवार लैंगिक अत्याचार

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर! एसआयआर मोहीमेमुळे पुन्हा ‘वेट अँड वॉच’; ४ ऑगस्टची मतदार यादी स्थगित

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    NEET! पहिल्याच दिवशी फास्ट ट्रॅक कोर्टात पेपरफुटीची सुनावणीला धक्का; CBI चे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत.

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार

    अंधेरीमधील धक्कादायक घटना; घरगुती शुल्लक वादातून मुलाकडून आई-वडिलांवर चाकूने सपासप वार