13 प्रधानमंत्री आणि 12 मुख्यमंत्र्यांच्या सभेची साक्षीदार असलेली, जिंतूर अग्निशामक दलाची राज्यातील सर्वात जुनी गाडी

परभणी जिल्ह्यात तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेले एकमेव फायर स्टेशन म्हणून जिंतूरची ओळख आहे. सन 1988 साली तालुका स्तरावर या फायर स्टेशनची स्थापना करण्यात आली. या फायर स्टेशनला लाभलेली एकमेव गाडी TATA 1210 1988 पासून म्हणजे गत 36 वर्षांपासून जिंतूरला अग्निशामक सेवा पुरवित आहे. सद्यस्थितीत ही गाडी सेवानिवृत्त होण्याला आली असून जिंतूर अग्निशामक दलाला आता नव्या गाडीची नितांत आवश्यकता भासत आहे.

अधिक माहिती अशी की, सन 1988 साली परभणी हिंगोली संयुक्त जिल्हा असताना जिंतूर मध्ये तालुकास्तरावर अग्निशामक दलाची स्थापना करण्यात आली. तेंव्हा 4500 लिटर पाणी साठवणूक क्षमता असलेली टाटा 1210 मॉडेलची गाडी शासनाने उपलब्ध करून दिली. या गाडीने जिंतूर तालुक्यासह परभणी हिंगोली जिल्ह्यात सेवा पुरवल्याची माहिती आहे. आपत्कालीन परिस्थितीत सदरील गाडीने हिंगोली परभणी जालना कळमनुरी लातूर परतुर अंबड या ठिकाणावर सेवा पुरवली आहे. मागील काही वर्षांपासून अग्निशामक दलाने जिंतूर नगर परिषद कार्यालयाकडे किमान 25 वेळा नवीन गाडीची मागणी केली आहे,आजवरचे सर्व आजी माजी आमदार आणि प्रशासक यांना देखील नविन गाडीसाठी साकडे घालण्यात आले परंतु कुणाकडूनही याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. याउलट हिंगोली परभणी परळी वैजनाथ पाथरी वसमत याठिकाणी दोन वेळा नवीन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. परंतु जिंतूर ला 36 वर्षांपासून एकच गाडी तालुक्याची आग विझवत आहे. बहुदा महारष्ट्र राज्यातील सर्वात जुनी गाडी म्हणून जिंतूर अग्निशामक दलाच्या गाडीची नोंद असावी. चार दशकांत झालेल्या सात पंचवार्षिक निवडणुकीच्या सर्व पक्षांच्या सभेला बंदोबस्तात या गाडीची हजेरी लागत आली आहे. राज्याचे सात मुख्यमंत्री पाहिलेली ही गाडी मोरारजी देसाई पासून ते नरेंद्र मोदींच्या सभेची साक्षीदार राहीली आहे. प्रदीर्घ शासनसेवा दिलेली गाडी आता कधी सेवानिृवृत्त होणार याची जिंतूर अग्निशामक दलाला प्रतीक्षा आहे. सद्या जिंतूर अग्निशामक दलात एकूण पाच लोक अत्यावश्यक सेवा देण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. यात विभागप्रमुख म्हणून चत्रू राठोड चालक मुजाहेद बेग मिर्झा, फायरमन सोनाजी गायकवाड, बाबाराव रोकडे आणि आर आर जाधव हे कर्मचारी रुजू आहेत. पुढील काही दिवसांत जिंतूर अग्निशामक दलात नवीन भरती झालेली उमेदवार सेवा देण्यासाठी रुजू होणार आहेत.

🔴केवळ गाडी नाही, ही तर जिंतूर न.प.ची लक्ष्मी आहे

जिंतूर तालुका लोकसंख्या विचार करता आजघडीला किमान दोन गाड्यांची आवश्यकता आहे. 36 वर्षांपासून सेवा पुरवणाऱ्या गाडीने आपत्कालीन परिस्थितीत आजपर्यंत कधीच दगा दिलेला नाही. आजवर या गाडीचे मोठे काम निघालेले नाही, टाटा मोटर्सने हे मॉडेल बंद केल्याने अधिकृत शोरुम नाही. छोटे मोठे मेंटनंस जिंतूर मध्येच कार्यालयाकडून करण्यात येते, गाडीची पाणी टाकी मजबूत आहे परंतु गाडीचा पत्रा बाहेरून सडला आहे. त्यामुळे नवीन गाडी असणे गरजेचे आहे. असे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

🔴 असे आहेत अग्निशामक सेवा दर…

ज्यांना सामाजिक कार्यक्रम आणि राजकीय सभा स्थळी अग्निशामक दलाची आवश्यकता आहे त्यांनी, न.प. कार्यालयात 48तास आधी मागणी अर्ज करावा लागतो. पहिल्या तीन तासासाठी चार हजार रुपये व त्यापुढे प्रती तास एक हजार रुपये शुल्क अग्निशामक कर म्हणून भरावा लागतो. शासकीय बंदोबस्ताला मात्र मोफत सेवा दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीत पूर्वी 02457/237041 हा क्रमांक लावावा लागत होता. परंतु थकीत बिलामुळे तो नंबर बंद असल्याचे सांगितले आहे. आपत्कालीन परिस्थितीत सद्या कार्यरत असलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधावा लागतो.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

    सकल मराठा समाजाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिंतूर प्रतिनिधी: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे तरुण सरपंच व मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून खून…

    बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भव्य मोर्चा

    सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी जिंतूर प्रतिनिधीबांगलादेशा मध्ये झालेल्या सत्तातरानंतर त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ दिनांक 10 डिसेंबर रोज जिंतूर शहरातून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पवईत ‘ख्वाहिश २०२५’चा जल्लोष; ७४ महाविद्यालयांतील १४३८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय; भाजपा–शिवसेना समसमान, अपक्ष ठरले निर्णायक

    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    • By Admin
    • December 18, 2025
    ख्वाहिश २०२५ : कला, संस्कृती आणि एकात्मतेचा उत्सव

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष