मतदान करण्यापूर्वी आत्मचिंतन करणे गरजेचे….

मतदान हा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि शक्तिशाली हक्क आहे. मात्र, अनेकदा मतदार हा हक्क वापरताना आत्मचिंतन करत नाहीत, ज्यामुळे आपल्या समाजावर, व्यवस्थेवर, आणि पुढील पिढ्यांवर होणारे परिणाम दुर्लक्षित होतात. आजच्या घडीला मतदान जनजागृतीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तरीही मतदानाचे प्रमाण घटतेच आहे. विशेषत: शहरी भागातील उच्चभ्रू सोसायट्यांमधील नागरिक मतदान टाळतात, ज्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळत असतात, तर दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र आवश्यक मूलभूत सुविधांसाठी देखील झगडत असतात.

खरेतर, जे नागरिक खरोखरच मतदान करतात त्यांनाच पाणी, रस्ते, आरोग्य सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहावे लागते. लोकप्रतिनिधी सहज उच्चभ्रू नागरिकांच्या भेटीला जातात, पण सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. हा फरक पाहता, खरे विश्वगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समान मतदान अधिकार जणू केवळ मत घेण्यापुरता राहिला आहे. एकदा मतदान झाल्यावर मतदाराला लोकप्रतिनिधींकडून साधी भेटदेखील मिळत नाही.

ग्रामीण किंवा शहरी भाग, दोन्हीकडेच आज अशी स्थिती आहे की, पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. प्रत्येक निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींची संपत्ती 10 पट वाढते, परंतु त्या भागातील नागरिकांच्या समस्यांचे मात्र काहीच निराकरण होत नाही. खराब रस्ते, दुर्लक्षित सरकारी दवाखाने, वाढलेले शैक्षणिक खर्च यामुळे सामान्य माणसाचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत आहे. कोणताही राजकीय पक्ष खरोखर सामान्य नागरिकांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे दिसत नाही.

म्हणून, नागरिकांनी मतदान करताना जात, धर्म, आणि भावनांवर आधारित निर्णय न घेता राजकीय पक्षांची शैक्षणिक, आर्थिक, आणि सामाजिक कामगिरी विचारात घेतली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समान मतदानाचे हक्क फक्त मतदानपुरते मर्यादित ठेवू नये, तर त्यातून आपले भवितव्य निश्चित करणारे शहाणपणाने निर्णय घ्यावे.

संपादक अमोल भालेराव

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    “ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली…” — आजचा कटू आरसा

    अमोल भालेराव, मुख्य संपादक – जागृत महाराष्ट्र  “ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली,  ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,  मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…!  कारण ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन…

    ‘युद्धाच्या पलिकडचा विचार”

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू