‘युद्धाच्या पलिकडचा विचार”

लेखक: अमोल भालेराव, संपादक – जागृत महाराष्ट्र न्यूज

भारत-पाकिस्तान दरम्यान मे 2025 मध्ये झालेला तीव्र संघर्ष, ज्यामध्ये सलग 3-4 दिवस गोळीबार, ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी सीमावर्ती भाग धगधगला, हा केवळ लष्करी विजय किंवा पराभवाचा विषय नाही. या युद्धाने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे: देशाला खरोखर युद्धाची गरज आहे का? पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26-28 नागरिकांचा बळी गेला, आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर हल्ले केले. परंतु, या युद्धात खरे नुकसान किती झाले? उपलब्ध माहितीनुसार, भारतात 47-49 नागरिक आणि 5-6 सैनिक मारले गेले, तर पाकिस्तानात 31-40 नागरिक आणि 11-15 सैनिकांचा मृत्यू झाला. एकूण 94-110 मृत्यूंचा हा आकडा खूपच कमी वाटतो, जेव्हा आपण दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये झालेल्या स्फोटांचा आणि ड्रोन युद्धाच्या तीव्रतेचा विचार करतो. एका गॅस सिलिंडरच्या स्फोटात 4-5 जणांचा जीव जाणाऱ्या देशात, सततच्या लढाऊ विमानांच्या गर्जना, ड्रोन हल्ले आणि अनेक हत्यारांच्या वापराने किती जीव गेले असतील? खरा आकडा लपवला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या युद्धाने खरोखर न्याय मिळाला का? की आणखी कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली?

सरकारकडून अधिकृत मृतांचा आकडा ९४ ते ११० दरम्यान दिला जातो, पण काहीही लपवले गेले नाही का, हा संशय मनात राहतोच. दोन राष्ट्रांमधील प्रचारयंत्रणा, राष्ट्रीय भावना आणि राजकीय प्रतिष्ठा यामुळे दोन्ही देश आपले नुकसान कमी व शत्रूचे अधिक दाखवतात, हे आपण पूर्वीही पाहिले आहे. जेव्हा क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले, लढाऊ विमाने यांचा वापर सलग चार दिवस केला जातो, तेव्हा केवळ १०० मृत्यूंचा आकडा खरा वाटतो का?

प्रश्न इतकाच नाही की किती मृत्यू झाले, तर ते जीवन कुणाचे होते? ते एक जवान होते, कुणाचा मुलगा, पती, वडील होते. ते एक नागरिक होते.

आपण हक्काने विचारायला हवे – हे युद्ध खरंच देशासाठी होते का? की एका भावनिक क्षणी निर्णय घेऊन, देशाच्या अंतर्गत प्रश्नांकडे लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार घडवला गेला?

देशात आजही:

* रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण पडलेले दिसतात.
* टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये महिन्याभराची प्रतीक्षा यादी आहे.
* गावे अजूनही वीज, पाणी, आरोग्य सुविधा यांपासून वंचित आहेत.
* बेरोजगारीच्या विळख्यात तरुण घुटमळत आहेत.
* शाळा, कॉलेजमध्ये शिक्षक अपुरे आहेत.
* कुपोषणामुळे लहान मुलांचे मृत्यू होत आहेत.

या सगळ्यावर उपाय न करता जर संपूर्ण लक्ष सीमापार कारवाईकडे वळवले गेले, तर खरे नुकसान कोणाचे होईल? गरीबांचे, सामान्यांचे, सैनिकांच्या कुटुंबियांचे, आणि आपल्या देशाच्या भविष्याचे.

देशभक्ती म्हणजे केवळ शत्रूवर वार करणे नाही, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचा जगण्याचा हक्क सुरक्षित करणेदेखील देशभक्तीच आहे. युद्धात टाळ्या वाजवण्याऐवजी, आपण आपल्या प्रश्नांवर उत्तर मागितले पाहिजे. समाजमाध्यमांवर “देशभक्त” होण्याऐवजी “जागरूक नागरिक” होणे जास्त महत्त्वाचे आहे.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना खरी श्रद्धांजली हीच असेल – की आपण असा देश घडवू जिथे पुन्हा युद्धाची गरजच भासणार नाही.

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

माहिमच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या नाट्यविभाग आयोजित ‘नाट्यांश’ हा एकाकिकांचा महोत्सव माटुंगाच्या यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात येत्या सोमवारी २७ तारखेला रंगणार आहे. या महोत्सवात रुपारेल नाट्यविभागाच्या एकूण तीन एकांकिका सादर केल्या जाणार…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

मुंबई, दि. २० : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील कामकाज आता नागरिकांसाठी थेट (लाईव्ह) प्रसारित करण्यास सुरुवात करण्यात आली असून, ही पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जात आहे. नगरसेवक हैदर अली…

Leave a Reply

You Missed

रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

  • By Admin
  • April 22, 2026
रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

राज्यात २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या | लातूरला नवे जिल्हाधिकारी, व्यवस्था होणार का भ्रष्टाचारमुक्त?

META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड

META ला मोठा झटका! मुलांच्या सुरक्षेप्रकरणी 3100 कोटींचा दंड