“ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली…” — आजचा कटू आरसा

अमोल भालेराव, मुख्य संपादक – जागृत महाराष्ट्र

 “ही न्याय व्यवस्था काहींची रखेल झाली,

 ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,

 मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…!

 कारण ही न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!”

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

कधी काळी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पवाड्यांच्या रूपात जे शब्द उच्चारले,
ते त्या काळातील शासनाच्या पायाभूत ढोंगीपणावर वज्रघात होते.
पण आज, अनेक दशकांनंतरही हेच शब्द आजच्या भारतात प्रत्यक्ष सत्यासारखे जिवंत दिसतात.
फरक फक्त एवढाच की, तेव्हा ही व्यवस्था नव्याने उभी राहत होती —
आणि आज ती संपूर्णपणे सडलेली, विकलेली आणि विकृत झाली आहे.

आज अधिकारी वर्गाला सरकारी पगार कामासाठी मिळतो,
पण काम करण्याऐवजी तोच अधिकारी फाइल हलवण्यासाठी चारपट वसुली करतो.
लोकशाहीचं नाव घेत नेते मंडळी मोठमोठे भ्रष्टाचार करून
देशाचे भूखंड, संपत्ती आणि मातीपर्यंत विकत आहेत.
हे सगळं पाहूनही जनता शांत आहे —
कारण ती लाचारीच्या साखळीत जखडली गेली आहे.

मतदानाच्या काळात ५ किलो रेशन,
दारूची बाटली, मटणाचा डबा, आणि दोन-तीन हजार रुपयांच्या नोटा —
हाच आजचा लोकशाहीचा हिशोब बनला आहे.
ही जनता आता विचारत नाही, ती फक्त विकली जाते.
स्वातंत्र्य मिळालं, पण विचार गुलाम झाले.

अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला तो ज्वालाग्राही नारा —

“ये आज़ादी झूठी है, हमारी जनता भूखी है.”

आज पुन्हा तितकाच जिवंत आणि तितकाच सत्य वाटतो. तेव्हा जनता भुकी होती;

न्यायासाठी, सन्मानासाठी आणि आशेच्या एका किरणासाठी भुकी आहे.

न्यायालयं आज काहींची रखेल झाली आहेत,
संसद ही हिजड्यांची हवेली झाली आहे —
हे केवळ शब्द नाहीत,
तर त्या लाखो नागरिकांच्या मनातील उसळती नाराजी आहे
ज्यांना आज न्यायाची अपेक्षा ठेवणे म्हणजे अपराध वाटतो.

शेतकरी आत्महत्या करत आहे,
तरुण बेरोजगारीने ग्रासला आहे,
तुरुंगात अनेक निर्दोष न्यायाच्या नावाखाली कुजत आहेत.
आणि सत्ता मात्र “सब ठीक है” म्हणत रंगमंचावर नाचत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली —
पण आजही अण्णाभाऊंचा तो आवाज कानात घुमतो :
“आज़ादी जुटी है… हमारी जनता भूखी है…”
प्रश्न आहे — आपण हे मान्य करणार का?
की पुन्हा एकदा आपल्याच लाचारीने या व्यवस्थेला
रंगीन, भ्रष्ट आणि निर्लज्ज बनू देणार?

🖋️ अमोल भालेराव
मुख्य संपादक — जागृत महाराष्ट्र
“सत्य सांगणं हा गुन्हा नाही;
पण सत्य ऐकणं आजच्या समाजाला अवघड झालं आहे.”

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Leave a Reply

    You Missed

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    गुटखा माफियांवर मकोका! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    पत्नीने खांद्यावर घेतले जू, सरकारने दिलेला बैल निघाला निकामी; लातूरच्या शेतकऱ्याचे संकट कायम! Latur Farmer News

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द

    दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय; न्यूजक्लिक आणि संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावरील FIR व ED चौकशी रद्द