वरंध पंचायत समिती गणातून कु. पूर्वा आनंद सुर्वे निवडणूक लढवणार…

वरंध:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांना लॉटरी लागली तर काही उमेदवार नाराज झाले आहेत. वरंध जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले तर वरंध पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला व खरवली पंचायत समिती गणासाठी ओबीसी महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. या जिल्हा परिषद गटातून मागील निवडणुकीत मनोज काळीजकर यांनी बाजी मारली होती. तर मनोहर रेशीम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आता मात्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही उमेदवार एकाच पक्षांमध्ये आहेत. शिवसेना पक्षाकडून वरंध पंचायत समिती गणामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते, हा मतदारसंघ मंत्री भरतशेठ गोगावले यांचा बालेकिल्ला समजला जातो, या गणातून मागील निवडणुकीत सपना मालुसरे यांनी निवडणूक जिंकून थेट पंचायत समिती सभापतीची खुर्ची मिळवली होती,आता मात्र या पंचायत समिती गणातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कन्या वैशाली गोगावले- मालुसरे यादेखील याच गणातून इच्छुक असल्याची बातमी प्रसारित झाली होती. तर निगडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नूतन गोपाळ मोरे व माजी पंचायत समिती सभापती सपना मालुसरे यादेखील याच गणातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे समजते. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार हे आता पाहणे गरजेचे आहे. या जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा थेट सामना रंगणार असून यामध्ये आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील उडी घेतली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उच्चशिक्षित असलेला चेहरा कुमारी पूर्वा आनंद सुर्वे वरंध पंचायत समिती गणातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.पिंपळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांची संपूर्ण ताकद कुमारी पूर्वा आनंद सुर्वे हिच्या पाठीशी असून या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार,कोण जिंकणार, कोण हरणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

    Click and Buy 

 

 

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुंबई : एकीकडे मुंबईसारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे-बसमधील असह्य गर्दी, आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे…

बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला…

Leave a Reply

You Missed

वरंध पंचायत समिती गणातून कु. पूर्वा आनंद सुर्वे निवडणूक लढवणार…

वरंध पंचायत समिती गणातून कु. पूर्वा आनंद सुर्वे निवडणूक लढवणार…

चहा विक्रेत्याच्या घरातून १ कोटी रोकड, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त – गोपाळगंज पोलिसांची सायबर फसवणुकीवर मोठी कारवाई

चहा विक्रेत्याच्या घरातून १ कोटी रोकड, ३४४ ग्रॅम सोनं आणि १.७५ किलो चांदी जप्त – गोपाळगंज पोलिसांची सायबर फसवणुकीवर मोठी कारवाई

‘ इंग्रजों के जमाने के जेलर हैं’चा आवाज कायमचा थांबला — दिग्गज अभिनेता असरानी यांचे निधन

  • By Admin
  • October 20, 2025
‘ इंग्रजों के जमाने के जेलर हैं’चा आवाज कायमचा थांबला — दिग्गज अभिनेता असरानी यांचे निधन

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत  कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने  उपासमारीची पाळी

“सिनेमा आणि शेती — दोघांचीही पेरणी मेहनतीची, पण कापणी नशिबाची!”

“सिनेमा आणि शेती — दोघांचीही पेरणी मेहनतीची, पण कापणी नशिबाची!”

खराब रस्त्यामुळे अपघात; मृत्यू झाल्यास ६ लाख भरपाई — ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

खराब रस्त्यामुळे अपघात; मृत्यू झाल्यास ६ लाख भरपाई — ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल; निलंबनाची कारवाई

मालवणी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल; निलंबनाची कारवाई