वरंध निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना; उद्धव ठाकरे गटाची पूर्वा सुर्वे रिंगणात

महाड (प्रतिनिधी : रामदास चव्हाण)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे इच्छुक उमेदवारांची लगबग वाढू लागली आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काहींना संधी मिळाली, तर काहींच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

वरंध जिल्हा परिषद गटासाठी ओबीसी महिला आरक्षण, तर वरंध पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला, आणि खरवली पंचायत समिती गणासाठी ओबीसी महिला आरक्षण घोषित झाले आहे. मागील निवडणुकीत या जिल्हा परिषद गटातून मनोज काळीजकर यांनी बाजी मारली होती, तर मनोहर रेशीम यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रतिस्पर्धी आता एकाच पक्षात आल्याने आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून वरंध पंचायत समिती गणात इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते. हा मतदारसंघ मंत्री भरतशेठ गोगावले यांचा बालेकिल्ला मानला जातो. मागील निवडणुकीत सपना मालुसरे यांनी याच गणातून विजयी होत पंचायत समिती सभापतीपद पटकावले होते. आता मात्र या जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असून पक्षांतर्गत स्पर्धा चुरशीची होणार आहे.

दरम्यान, मंत्री गोगावले यांच्या कन्या वैशाली गोगावले-मालुसरे, नूतन गोपाळ मोरे (विद्यमान सरपंच, निगडे ग्रामपंचायत) आणि माजी सभापती सपना मालुसरे या तिन्हींची नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरीकडे, या गणातून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही आपली ताकद दाखवली आहे. उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा कुमारी पूर्वा आनंद सुर्वे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांचा पाठिंबा त्यांना लाभल्याने लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात आता शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विरुद्ध उद्धव ठाकरे गट अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे वरंध पंचायत समिती गणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

CLICK AND BUY

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू ठाणे,दि.१५ एप्रिल देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरात राबविण्यात…

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

उदगीर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर / उदगीर महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एक वादग्रस्त घटना…

Leave a Reply

You Missed

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका. यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

  • By Admin
  • April 22, 2026
रुपारेल महाविद्यालयाचे विद्यार्थी एकाच दिवशी सादर करणार लागोपाठ तीन एकांकिका.  यशवंत नाट्यमंदिरमध्ये रंगणार ‘नाट्यांश’ महोत्सव.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  कामकाजाचे लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू — नगरसेवक हैदर अली असलम शेख यांच्या मागणीला यश

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात; ठाण्यात ‘संघटन सृजन अभियान’ सुरू

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची महत्त्वाची बैठक; DJ वर बंदी, शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

Indira Gandhi National Open University चा 39 वा दीक्षांत सोहळा मुंबईत पार पडला; २,८८७ विद्यार्थ्यांना पदव्या

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई