मुख्यमंत्री फडणवीस यांचे बिहारमधील वक्तव्य वादात—‘छटपूजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साजरी करू’ या वक्तव्यावर सोशल मीडियावर ट्रोलिंग

मुंबई : एकीकडे मुंबईसारख्या महानगरात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, रेल्वे-बसमधील असह्य गर्दी, आणि वाहतूक कोंडी यामुळे मुंबईकर अक्षरशः हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने “राज्यातील रोजगार आणि जागा प्रथम स्थानिकांसाठी राखीव ठेवाव्यात” अशी ठाम मागणी केली आहे. तसेच बाहेरील राज्यांमधून होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराला त्यांनी विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार दौऱ्यावर असताना केलेले वक्तव्य आता सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले —

“या वर्षी बिहारमध्ये निवडणुका असल्याने आपण छटपूजा एकत्र साजरी करू शकत नाही, परंतु पुढील वर्षी आपण मुंबईत मोठ्या उत्सवात छटपूजा एकत्र साजरी करू.”

या विधानानंतर अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर फडणवीस यांच्यावर टीका करत संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचा सवाल असा की —
“मुंबईतील वाढती लोकसंख्या, स्थानिक बेरोजगारी आणि सुविधा अभाव यावर सरकारचे लक्ष का नाही? बाहेरील मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न का केला जातोय?”

राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, या वक्तव्यामुळे ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचे’ हा जुना मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

उदगीर शहरातील कार्यालयाबाहेर एका व्यक्तीने लघवी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल लातूर / उदगीर महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एक वादग्रस्त घटना…

लोकवर्गणीतून निवडणूक, जनतेसाठी संघर्ष; वॉर्ड 86 मध्ये CPI(M) उमेदवार मैदानात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M)

लोकवर्गणीतून निवडणूक, जनतेसाठी संघर्ष; वॉर्ड 86 मध्ये CPI(M) उमेदवार मैदानात मुंबई | प्रतिनिधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) ही गेल्या अनेक दशकांपासून कामगार, वंचित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारा…

Leave a Reply

You Missed

“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

  • By Admin
  • February 13, 2026
“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

  • By Admin
  • February 8, 2026
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

NCP Sunetra Pawar :शपथविधीपूर्वी बारामतीत पवार कुटुंबीयांची गुप्त बैठक, शरद पवारांची ‘थांबा’ भूमिका, तरीही सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना

शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

शारीरिक संबंध आणि अपत्य जन्म‘विवाहाच्या स्वरूपातील नाते’;मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्वाळा

‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ वक्तव्य प्रकरणी AIMIM नेते सहर शेख यांचा माफीनामा मुंब्रा पोलिसांकडून नोटीस, किरीट सोमय्यांचा दावा

दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

दिव्यांग व वयोवृद्धांची राज्य निवडणूक आयोगवर तीव्र नाराजी

मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीरात राजकीय खळबळ; आमदार कार्यालयाबाहेर लघवी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे, हे आपले उद्दिष्ट असावे. __ बी. बी. मेश्राम

अज्ञानी जनतेला जागृत करून सज्ञानी बनविणे, हे आपले उद्दिष्ट असावे. __ बी. बी. मेश्राम