बुलढाणा जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार; दुहेरी नोंदणी आणि कारवाईचा अभाव — आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

बुलढाणा (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीत तब्बल एक लाखाहून अधिक बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षांहून अधिक काळ लोटला असतानाही त्यांची नावे मतदार यादीत कायम असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर पंधरा वर्षांपूर्वी येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही आजही मतदार यादीत असल्याचे त्यांनी उघड केले आहे. गायकवाड म्हणाले की, मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार अशा मतदारांची यादी दिली आहे ज्यांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेली आहेत. मात्र, आजवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. निवडणूक आयोगालाही याबाबत माहिती देण्यात आली असता, त्यांनी ‘बोगस नावे काढू नका’ अशी भूमिका घेतल्याने हा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गायकवाड यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, अनेक मतदार प्रत्यक्षात ग्रामीण भागात राहतात, परंतु शहरी भागातील निवडणुकीसाठी आपले नाव तिथे नोंदवतात. त्यामुळे दुहेरी मतदानाचा संशय निर्माण होतो. अशा मतदारांकडे दोन्ही ठिकाणी नावे असल्यामुळे ते दोन्ही ठिकाणी मतदान करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाने तत्काळ चौकशी करून योग्य ती दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना आमदार गायकवाड म्हणाले की, राज्यातील तिन्ही पक्ष — शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) — यांच्यात महायुती होण्याची सर्वांचीच इच्छा आहे. बुलढाणा जिल्ह्यात युती करण्याचा कल स्पष्ट असून अंतिम निर्णय आगामी बैठकीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, युतीच्या माध्यमातून मतदारांना एकसंध संदेश देणे हेच उद्दिष्ट असून स्थानिक पातळीवर मतभेद न ठेवता निवडणुका लढवण्याची भूमिका नेत्यांची आहे.

शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत आमदार गायकवाड म्हणाले की, संजय राऊत ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला आणि आता आघाडीतील पक्ष संपवण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेसला ते मान्य होणार नाही, हे आम्ही आधीच सांगितले होते. त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. एका मतदारांपर्यंत जर तीन वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका गेल्या, तर ते मतदाराला पटत नाहीत. मतदारांना स्पष्ट आणि स्थिर नेतृत्व हवे असते, असेही त्यांनी म्हटले.

बुलढाणा जिल्ह्यातील बोगस नावे आणि दुहेरी नोंदणीचा मुद्दा हा लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा असून प्रशासनाने या आरोपांची गंभीरतेने दखल घेऊन पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप! प्रतिनिधी -संदेश घोलप, नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत भव्य प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘नंदनवन’वर ऐतिहासिक सोहळा दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना…

मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

प्रवाशांच्या समस्यांवर मनसेची भूमिका आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. स्थानकावर छताची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता,…

Leave a Reply

You Missed

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार