राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आहेत . तरीही महाराष्ट्र राज्य सरकार आणि आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव काय करित आहेत हे कळत नाही. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक आमदार आणि खासदारांनी या गंभीर बाबीकडे पराकोटीचे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट राज्य सरकार आमदार आणि खासदार यांच्या खात्यात काही गरज नसतांना दिवाळीपुर्वी वेतन देणार आहे. मात्र आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून वेतन देण्यात अपयशी ठरले आहे.वेतन दिवाळीच्या अगोदर मिळाले पाहिजे यासाठी सर्व स्थानिक आमदार आणि खासदार यांनी हा प्रश्न अत्यंत जलदगतीने शासनाच्या दरबारात पाठवुन न्याय मिळवून द्यावा. आरोग्य मंत्री , सचिव आणि आयुक्त यांनी या बाबत तात्काळ लक्ष वेधून वेतन करावे. PFMS पद्धतीने वेतन अदा करावे अशी अँक्टिव्हिटी केल्याशिवाय वेतन दिवाळी पूर्वी होणार नाही तसेच शासनाने जिल्ह्यांना लिमिट देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे . नवीन प्रणाली असल्याने कर्मचारी सुद्धा जीव लावून प्रयत्न करत आहेत .यात शंका नाही परंतु तांत्रिक गोष्टी बघता दिवाळी अगोदर वेतन होणे आवश्यक आहे . कंत्राटी कर्मचारी यांना वेतन नसल्यामुळे निराशा निर्माण झाली आहे. शासन दरबारी असलेल्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण काळोख्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या बाबत सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांच्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे यांनी आरोग्य मंत्री , आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , यांना तात्काळ भ्रमणध्वनी वरुन आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी वेतन देण्यात यावे अशा सूचना दिल्या.
तसेच आरोग्य मंत्री , वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून जुन्या पद्धतीने वेतन करण्याबाबत सूचना दिल्या.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    सूर्याचे अंडी – जगातील सर्वात महागडा मियाझाकी आंबा

    आंबा म्हणजे भारताचे आवडते फळ, पण जगात असा एक आंबा आहे ज्याची किंमत लाखोंमध्ये जाते. हा म्हणजे मियाझाकी आंबा, ज्याला जपानमध्ये “तायो नो तमागो” म्हणजेच “सूर्याचे अंडी” म्हणून ओळखले जाते.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    • By Admin
    • December 15, 2025
    महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला! मुंबईसह 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल”

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    • By Admin
    • December 2, 2025
    नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

    Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू