राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आहेत . तरीही महाराष्ट्र राज्य सरकार आणि आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव काय करित आहेत हे कळत नाही. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक आमदार आणि खासदारांनी या गंभीर बाबीकडे पराकोटीचे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट राज्य सरकार आमदार आणि खासदार यांच्या खात्यात काही गरज नसतांना दिवाळीपुर्वी वेतन देणार आहे. मात्र आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून वेतन देण्यात अपयशी ठरले आहे.वेतन दिवाळीच्या अगोदर मिळाले पाहिजे यासाठी सर्व स्थानिक आमदार आणि खासदार यांनी हा प्रश्न अत्यंत जलदगतीने शासनाच्या दरबारात पाठवुन न्याय मिळवून द्यावा. आरोग्य मंत्री , सचिव आणि आयुक्त यांनी या बाबत तात्काळ लक्ष वेधून वेतन करावे. PFMS पद्धतीने वेतन अदा करावे अशी अँक्टिव्हिटी केल्याशिवाय वेतन दिवाळी पूर्वी होणार नाही तसेच शासनाने जिल्ह्यांना लिमिट देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे . नवीन प्रणाली असल्याने कर्मचारी सुद्धा जीव लावून प्रयत्न करत आहेत .यात शंका नाही परंतु तांत्रिक गोष्टी बघता दिवाळी अगोदर वेतन होणे आवश्यक आहे . कंत्राटी कर्मचारी यांना वेतन नसल्यामुळे निराशा निर्माण झाली आहे. शासन दरबारी असलेल्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण काळोख्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या बाबत सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांच्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे यांनी आरोग्य मंत्री , आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , यांना तात्काळ भ्रमणध्वनी वरुन आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी वेतन देण्यात यावे अशा सूचना दिल्या.
तसेच आरोग्य मंत्री , वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून जुन्या पद्धतीने वेतन करण्याबाबत सूचना दिल्या.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण!

    मुंबई ,मढ:परिसरात महापुरुषांच्या विचारांचा जागर; सिद्धार्थ वैद्य आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने भव्य बॅनरचे दिमाखात अनावरण! मुंबई ,मढ- परिसरामध्ये सामाजिक ऐक्य आणि महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. सिद्धार्थ…

    मंत्रालयात डी.जी. प्रवेश – सन्मान की त्रासदायक प्रतीक्षा?

    जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या “मंत्रालय” या प्रशासकीय मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी काही वेगवेगळ्या श्रेणीचे पास आणि परवानग्या दिल्या जातात. त्यामध्ये “डी.जी. प्रवेश” म्हणजेच D.G. Entry हा एक विशेष आणि…

    Leave a Reply

    You Missed

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    Mamta Banerjee;सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो; ममता बॅनर्जी कोर्टात का पोहोचल्या?

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    NEET पेपर लीक;NEET पेपर लीक प्रकरणात खळबळ! परीक्षा रद्द होणार? CBI चौकशीची तयारी; NTA ने मान्य केली जबाबदारी

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    Mumbai Coastal Road : वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडला वेग; उत्तर मुंबईसाठी मोठा दिलासा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    नांदेडच्या इतिहासातील शस्त्रजप्तीची सर्वांत मोठी कारवाई!५ हजार घातक शस्त्रे जप्त

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    भारताने पाकिस्तानची १३ विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले   तिन्ही सैन्यदलांनी दिली माहिती

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    तमिळनाडूत विजय यांचा विजय! राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    जिद्द आणि चिकाटीचा विजय: लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी आई अन् मुलगा दोघेही बारावी उत्तीर्ण!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!

    कलिंगड की घातपात? पायधुनी मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले!