मुंबईत CNG तुटवडा तीव्र – नागरिकांची दमछाक, ऑटो-टॅक्सी चालकांचे मनमानी दर; कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा?

मुंबईसह संपूर्ण राज्यात CNG Maharashtra CNG crisis नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे गेल दोन दिवसांपासून पुरवठा बाधित असून मुंबई आणि ठाण्यातील CNG पंपांवर सलग दुसऱ्या दिवशीही लांबलचक रांगा दिसत आहेत. अनेक पंपांवर पुरवठा थांबल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

ऑफिसच्या वेळेत नागरिकांची दमछाक

सकाळची ऑफिसची वेळ… त्यात CNG तुटवडा… आणि यामुळे ऑटो व टॅक्सी मिळणे अक्षरशः कठीण  झाले आहे.
जिथे पहाल तिथे “ऑटो कुठे? टॅक्सी कुठे?” अशी आरडाओरड सुरू आहे.

शालेय वाहतूक, कार्यालयीन प्रवासी, महिला, वृद्ध — सर्वांनाच या गोंधळाचा मोठा फटका बसत आहे.ऑटो–टॅक्सी चालकांचे मनमानी दर : 20–30 रुपये जास्त मागणी

पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक ऑटो व टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून 20 ते 30 रुपये जादा घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

अनेक ठिकाणी चालक उघडपणे सांगत आहेत—

“CNG नाही… पेट्रोलवर गाडी चालवतोय… जादा पैसे द्या नाहीतर पुढे जा!”

प्रवाशांचा प्रश्न अगदी रास्त आहे की —मिटर रेट 25 रुपयांपेक्षा जास्त पेट्रोलसाठी असतो का? की तो CNG वर चालणाऱ्या गाड्यांसाठी असतो?

नागरिक या मनमानीला बळी पडत आहेत, कारण ऑटो-टॅक्सी मिळणंही अवघड झालं आहे.

पोलीसही मूक? निर्मात्याचा धक्कादायक अनुभव एका मराठी निर्मात्याने “नाव न सांगण्याच्या अटीवर” सांगितलेला प्रसंग तर अधिक गंभीर आहे.
त्यांनी एका चालकाला जादा भाड्यावरून प्रश्न विचारताच… आणि “चल, पोलिसांकडे तक्रार करू” असे म्हणताच…चालक म्हणाला — ‘हो चला!’हा आत्मविश्वास कसा?निर्माते सांगतात— “पोलिसांनी त्याला बसवले… काही क्षणात सोडूनही दिले. त्यांना माहिती आहे की ‘आपलेच सहकारी आहेत’.”

या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरचा विश्वास धक्का बसत असून कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह  उभे राहिले आहे.

सरकारचे नियंत्रण सुटले का?

CNG तुटवडा — ऑटो-टॅक्सींची मनमानी — पोलिसांची दुर्लक्ष — नागरीकांचे वाढते हाल…
या सर्वातून व्यवस्थेचे नियंत्रण ढासळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

वाहतूक, इंधन, सार्वजनिक सेवा, नागरिकांचे दैनंदिन आयुष्य आणि सुरक्षितता — सगळेच प्रश्नचिन्हाखाली.

नागरिक विचारत आहेत—

“सरकार कुठे आहे?”

“व्यवस्था चालवणारा कुठे झोपला आहे?”
“जादा पैसे देणे बंधनकारक आहे का?”

लोकांचे मत स्पष्ट आहे —
या परिस्थितीने सरकारने व्यवस्थेवरील पकड गमावली आहे.
नागरिकांचा विश्वास हादरला आहे.

सध्याची परिस्थिती

 राज्यभरात CNG पुरवठा खंडित

पंपांवर 1 ते 2 किमी लांबीच्या रांगा

ऑटो-टॅक्सी चालक उघडपणे जादा रक्कम मागत आहेत

 प्रवाशांशी वाद, असुरक्षितता वाढ

पोलिस कारवाईचे नाव नाही

 नागरिक, विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी अडचणीत

 आणीबाणीच्या सेवांनाही फटक

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali मुंबईच्या कांदिवली वेस्ट येथील चारकोप परिसरातील गरुड पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी धाडसी गोळीबाराची घटना घडली. तीन अज्ञात व्यक्तींनी एका…

इंटरनेटवर ‘डिजिटल भूकंप’; क्लाउडफ्लेअर सर्व्हर कोसळले, जग ठप्प

विशेष प्रतिनिधी, मुंबई/नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर जगातील सर्वात मोठी इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी क्लाउडफ्लेअरच्या सर्व्हरमध्ये आज दुपारी अचानक आलेल्या प्रचंड बिघाडामुळे संपूर्ण डिजिटल विश्व ठप्प झाले. भारतात दुपारी सुमारे ५.१८ वाजता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

दिल्ली विजयानंतर AIFB कल्याण-उल्हासनगर मनपा निवडणुकीत!

बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

बनावट IAS कल्पना भागवत घोटाळा: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठा फसवणूक प्रकरण

संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

संचार साथी ॲपवर प्रियंका गांधींच्या फोन हेरगिरीचा संशय कितपत खरा? Sanchar Saathi App:

नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

  • By Admin
  • December 2, 2025
नगरपरिषद निवडणूक निकाल लांबणीवर,आता ‘या’ तारखेला होणार घोषणा

फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

फरहान आझमींची नवी जबाबदारी,मुंबई अल्पसंख्य काँग्रेसचे नवे अध्यक्ष

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; आरक्षणावरील अंतिम निर्णय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे — पुढील सुनावणी 21 जानेवारीला

महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

महाड – बिरवाडी येथे भव्य वार्षिक सोहळा संपन्न…

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali कांदिवली वेस्टमध्ये गोळीबार: तीन अज्ञात आरोपींचा हल्ला, एक जखमी; पोलिस तपास सुरू

असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय! — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना

असिम सरोदे प्रकरण: न्यायव्यवस्थेवरील दबावाचा पर्दाफाश – वकिलांच्या स्वातंत्र्याचा आणि कणखरतेचा विजय!  — ॲड. सुभाष पगारे यांनी व्यक्त केलेल्या भावना