“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव”

 

विराळ, ता. जळकोट, जि. लातूर येथे श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, मुलांना शैक्षणिक मदत देखील केली जाते. या कार्यातून अध्यक्ष नरसिंग सोनटक्के यांनी आदर्श शिक्षक व समाजसेवक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्री समर्थ सद्गुरु धोंडू तात्या महाराज यांच्या 94 व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्या अंतर्गत आज, शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता विराळ येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक, सामाजिक, कृषी, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा
“गौरव कार्याचा – सन्मान भूमिपुत्रांचा”
या उपक्रमांतर्गत सन्मान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते सन्मान होणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये
मनमथआप्पा किडे, उषाताई संभाजी पाटील तळेगावकर, रामचंद्र भाऊ तिरुके, धर्मपाल देवशेट्टे, सुनीताताई संभाजी कोसंबे, प्राध्यापक माधव वाघमारे, राहुल बालाजी झोले, शिवकांता गंगाधर ताकबिडे यांचा समावेश आहे.

तसेच या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष नरसिंग सोनटक्के, उपाध्यक्ष ज्ञानोबा जाधव, उपाध्यक्ष संजय येरनाळे, कोषाध्यक्ष देवराव सोनटक्के, सचिव शिवशांभ सोनटक्के तसेच सर्व सदस्य श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान व समस्त विराळ ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी गावातील तसेच परिसरातील सर्व नागरिक, भाविक भक्त आणि सन्मानार्थी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“सिनेमा आणि शेती — दोघांचीही पेरणी मेहनतीची, पण कापणी नशिबाची!”

सिनेमा आणि शेती — दिसायला दोन वेगवेगळे जग, पण दोघांचा आत्मा एकच आहे… मेहनत, जोखीम आणि आशा. शेतकरी पिकाची पेरणी करतो, दिवस-रात्र घाम गाळतो, पाऊस, वादळ, कर्ज आणि बाजारभाव यांचा…

Leave a Reply

You Missed

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

भिवंडी डंपर अपघात: ३ वर्षीय बालकाचा मृत्यू, डंपर पेटवला

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोलीला पुन्हा भूकंपाचा धक्का! औंढा नागनाथ तालुक्यात केंद्रबिंदू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

Telangana ACB Raid: DSP संकीरेड्डी भीम रेड्डींवर छापे, 150 कोटींहून अधिक संपत्ती उघड

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

पालघरला रेड अलर्ट; मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा, लोकल वाहतुकीवर परिणाम

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची विधानसभेत मोठी घोषणा; विनापरवाना IVF केंद्रे आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आता मकोका कारवाई

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

चितळीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे मानद डॉक्टरेटने सन्मानित; साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार